शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

संजय साठवणे साकोली : पर्यटन हा शब्द मुळातच आनंद देणारा आहे. अनेक पर्यटनस्थळांना इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. जमिनीच्या एखाद्या ...

संजय साठवणे

साकोली : पर्यटन हा शब्द मुळातच आनंद देणारा आहे. अनेक पर्यटनस्थळांना इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. जमिनीच्या एखाद्या भूभागावर नैसर्गिक सौंदर्याचा आधार घेऊन त्या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र घोषित करतात. पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र निधीअभावी भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उपेक्षितच आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे सन १९७० पासून जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात झाली. २७ सप्टेंबर १९८० पासून पहिला जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात आला. पर्यटन क्षेत्राचा प्रचार, प्रसार व्हावा आणि योग्य वेळी योग्य निधी उपलब्ध करून लोकोपयोगी विकास साधावा, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही गावाची, शहराची, राज्याची किंवा एखाद्या देशाची नेत्रदीपक प्रगती होऊ शकते. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो. गरीब कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पर्यटनस्थळांचा मोठा वाटा राहिलेला आहे.

बॉक्स

जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळे

पर्यटनाच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्य़ाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सिंधपुरी बौद्ध विहार पवनी, पवनीचा किल्ला, आंबागड किल्ला, सानगडी किल्ला, रावणवाडी तलाव, चांदपूर तलाव, शिवनीबांध जलतरण तलाव, कोरंभी मंदिर, इंदिरासागर धरण, कोका वन्यजीव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य आणि पवनी - कह्रांडला अभयारण्य इत्यादी अनेक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.

कोरोनामुळे रोजगार मिळेना

कोरोनाचे संकट आल्यामुळे लाखो पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम गाईड, जिप्सीचालक, गेटजवळच्या लहान मोठ्या दुकानदारांवर झालेला आहे. शासनालाही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पर्यटनस्थळाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कोट बॉक्स

पर्यटनस्थळामुळे शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात पैसा जमा होतो. त्यामुळे अशा स्थळांचा सुविधांयुक्त विकास होणे अपेक्षित आहे.

- विनोद भोवते, पर्यटनप्रेमी साकोली.