शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अन् परप्रांतीय विक्रेते, मजुरांना अश्रू झाले अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 5:00 AM

संचारबंदीमुळे कुठे फिरता येईना, परिणामी झाडू विक्री बंद झाली. आपल्या मूळ गावी जायचे तर हातात पैसे नाहीत आणि आता तर सीमाबंदीच्या कठोर आदेशाने मध्यप्रदेशातील झाडूची विक्री करून पोट भरणारे ५७ जण चिंतीत होते. अशा विक्रेत्यांची शासकीय वसतीगृहात उत्तम सोय करण्यात आल्याने या मजूरांनी सुटकेचा श्वास सोडला. दररोज दोन वेळचे पोटभर जेवण आणि कुटुंबासह स्वत:ची निवासाची व्यवस्था झाल्याने हे मजूर निश्चिंत झाले आहेत.

ठळक मुद्देसंकटातील मदत विसरणार नाही : वर्ध्याहून छिंदवाडाकडे निघालेल्या मजूरांची व्यथा

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरुन झाडू विकणाऱ्या मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील मजुरांना संचारबंदीच्या काळात प्रशासनाने मदतीचा हात दिला. त्यांची येथील शासकीय वसतीगृहात भोजनासह निवासाची व्यवस्था केली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते.संचारबंदीमुळे कुठे फिरता येईना, परिणामी झाडू विक्री बंद झाली. आपल्या मूळ गावी जायचे तर हातात पैसे नाहीत आणि आता तर सीमाबंदीच्या कठोर आदेशाने मध्यप्रदेशातील झाडूची विक्री करून पोट भरणारे ५७ जण चिंतीत होते. अशा विक्रेत्यांची शासकीय वसतीगृहात उत्तम सोय करण्यात आल्याने या मजूरांनी सुटकेचा श्वास सोडला. दररोज दोन वेळचे पोटभर जेवण आणि कुटुंबासह स्वत:ची निवासाची व्यवस्था झाल्याने हे मजूर निश्चिंत झाले आहेत.संचारबंदीच्या कालखंडात आलेल्या कटु अनुभवांचा काही जणांनी वसतीगृहाच्या अधीक्षक रजनी वैद्य यांच्यासमोर पाढाच वाचला. त्यामुळे गत दोन दिवसापासून तुम्ही आमची काळजी घेतलीत, इतकी तर आमच्या घरीपण व्यवस्था नाय असे सांगितले. पण जाता जाता आमच्याकडे देण्यासारखं काही नाय पण आमची काहीतरी आठवण ठेवून घ्या म्हणत काही महिलांनी मॅडम आमच्या जवळील झाडू तरी किमान वसतीगृहासाठी भेट म्हणून ठेवून घ्या असे म्हणत वसतीगृहासाठी झाडू भेट दिले.वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूंबाबत मार्गदर्शन करुन आम्हाला खरोखरच मानसिक धीर दिला. यावेळी अनेकांना बोलताना अश्रू अनावर झाले. वर्धा, नागपूरवरुन पायी चालत येताना काही खायला तर मिळतच नव्हते. पण इथे आल्यावर घरच्यापेक्षाही चांगली व्यवस्था केल्याने आम्ही खरच शासनाचे लई आभारी आहोत असे कुटुंब प्रमुखांनी सांगितले. धास्तावलेल्या निराधार मजूरांची जिल्हाधिकारी व शहरातील नागरिकांनी मदत केल्याचे अधीक्षक वैद्य यांनी सांगितले. निराधारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी तसेच मुलींच्या वसतीगृहातील कर्मचारी वैशाली गजभिये, अश्विनी नागदेवे, अनिता बुजडे, राधेश्याम बुजदे, सीमा सुखदेव, त्रिशीला बागडे, गीता बागडे, विनोद गोंनादे, स्वयंपाकी कारेमोरे, मोहन धारगावे दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.कोरोनाच्या संकटकाळात आमच्याकडून निराधार कुटुंबाची सोय होत असल्याने अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने शासनाच्या आदेशाचे पालन करुन घराबाहेर पडणे टाळले पाहिजे.-रजनी वैद्य, अधीक्षक, शासकीय वसतीगृह, भंडारा.

टॅग्स :Socialसामाजिक