शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
Delhi Blast : "आम्ही गेट उघडला आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
4
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
5
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
8
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
9
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
10
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
11
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
12
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
13
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
14
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
15
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
16
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
17
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
18
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
19
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
20
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

Chaturmas 2022: चातुर्मासात 'या' पाच गोष्टींचा उपास ठरू शकतो लाभदायी; विचार करा आणि कृती करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:25 IST

Chaturmas 2022: याव्यतिरिक्त तुमच्या डोक्यात काय संकल्प आहेत ते कागदावर उतरवा आणि त्याची सुरुवात आषाढीच्या मुहूर्तावर करा. 

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक भाविक अध्यात्मिक उन्नतीसाठी वेगवेगळे संकल्प करतात. जसे की ग्रंथवाचन, स्तोत्रपठण, हरिकीर्तन, एकवेळ भोजन इ. परंतु आपले मानसिक स्वास्थ्य नीट नसेल तर अध्यात्मिक गोडी कशी लागणार? यासाठी आपण मानसिक पातळीवर काही संकल्प करू शकतो. चार महिने सातत्याने आपण जर संकल्प पूर्ण केला तर हा काळ आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकेल. उदाहरणादाखल काही संकल्प देत आहे, त्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्राधान्य क्रम लक्षात घेऊन बदल करू शकता. 

रागवायचे नाही : हा संकल्प अत्यंत कठीण आहे, पण पार पाडला तर आयुष्यभर कामी येणारा आहे. रागावर नियंत्रण मिळवणे सर्वात कठीण. परंतु या रागानेच आपण आपले नुकसान करून घेतो. मग घर असो वा ऑफिस रागवायचे नाही हा संकल्प सोडला तर मनावर नियंत्रण मिळवता येईल आणि आयुष्यभराची सवय जडेल. यासाठी करायचे एवढेच, राग आला की क्षणभर मनात सात वेळा म्हणायचे संकल्प....! राग निवळेल आणि संकल्पाला बळ मिळेल. 

व्यायाम : वेळ नाही अशी सबब देऊन आपण व्यायाम टाळतो. जर आपण सोशल मीडियासाठी दिवसातले एक दोन तास खर्च करू शकत असू तर व्यायामासाठी १५ मिनिटे का काढू शकत नाही? अशी स्वतःला विचारणा करा आणि सोयीची वेळ निवडून किमान १५ मिनिटं व्यायाम करा. योगाभ्यास, डान्स, दोरीच्या उड्या, खेळ असा कोणताही प्रकार निवडा, ज्यामुळे छान घाम निघू शकेल आणि उत्साही वाटेल. चार महिने हा उपक्रम करा आणि तना-मनात घडलेला फरक बघा!

ध्यानधारणा : दिवसातला काही वेळ जर आपण स्वतःसाठी देत नसू तर आपण उत्तम संवादाला मुकत आहोत असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हे कळत असूनही आपण वळवत नाही. यासाठी सकाळी उठल्यावर पाच मिनिटं आणि झोपण्यापूर्वी पाच मिनिटं स्वतःसाठी ठेवा. स्वतःच्या आत डोकावून बघा. जे विचार येतील ते येउद्या. पण शांत बसून डोक्यात चालणाऱ्या घडामोडींचा आढावा घ्या. यातूनच सरावाने एक दिवस तुम्हाला शांत चित्ताची अनुभूती होईल!

मोबाईलचा उपास : सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपण दिवसाचा बराच वेळ वाया घालवतो. डोळ्यांना त्रास तर होतोच, शिवाय डोक्यावर ताण येतो. वेळ वाया जातो ही बाब वेगळी. यासाठी चार महिने आपण सोशल मीडियाचा एकवेळ उपास करू शकतो. अर्थात जसे चातुर्मासात एकवेळ जेवतात तशी सोशल मीडिया वापराची वेळ ठरवून घ्यायची आणि तेवढ्याच वेळेत फोन वापरायचा. यामुळे वाचणारा वेळ आपण आपल्या छंदांसाठी, घरच्यांसाठी किंवा नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी देऊ शकतो. 

खाण्यावर नियंत्रण : चातुर्मासात पचन शक्ती मंदावते म्हणून धर्मशास्त्राने विविध उपास सांगितले आहेत. परंतु येता जाता अरबट-चरबट खाण्याची सवय असणाऱ्यांना एकएक उपास करणं अवघड वाटेल. यासाठी खाण्यावर नियंत्रण राखणे हा पर्याय निवडता येऊ शकतो. दिवसातून तीनदा चहा घेणाऱ्यांनी दोनदा, चारदा जेवणाऱ्यांनी तीनदा, तीन पोळ्या खाणाऱ्यांनी दोन पोळ्या, बाहेरचे खाणाऱ्यांनी घरचे जेवण असे सुयोग्य बदल करून आपण भूक न मारता आरोग्यदायी सवयींनी नियंत्रण आणू शकतो. त्यामुळे तब्येत सुधारेल आणि उत्साही वाटेल. 

याव्यतिरिक्त तुमच्या डोक्यात काय संकल्प आहेत ते कागदावर उतरवा आणि त्याची सुरुवात आषाढीच्या मुहूर्तावर करा. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य