शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Walmik Karad : वाल्मीक कराड सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अडकणार? एसआयटीने कोर्टात मोठे दावे केले; न्यायालयात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:05 IST

Walmik Karad : वाल्मीक कराड याला आज कोर्टाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Walmik Karad ( Marathi News ) : पवनचक्की कंपनीला मागितलेल्या दोन कोटींच्या लाच प्रकरणात संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. काल कराड याच्याविरोधात मकोका गुन्हा दाखल केला, आता एसआयटीने कराड याचा सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करण्यासाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज एसआयटीने वाल्मीक कराड याला कोर्टासमोर आणले. यावेळी एसआयटीने वाल्मीक कराड याच्याबाबत सात मोठे दावे केले आहेत. यामुळे आता कराड याच्या अडचणी आणखी वाढू शकतात. 

मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुन्हा बाईक टॅक्सी सुरु होणार; सरकारने कायदाच बनविला, दोन महिन्यांत...

वाल्मीक कराड याला आज एसआयटीने कोर्टात हजर केले.  यावेळी एसआयटीने कोर्टाला महत्वाची माहिती दिली, खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगितले. ही हत्या खंडणी प्रकरणामुळेच झाल्याचा दावा एसआयटीने न्यायालयात केला. पवनचक्की कंपनी अवादाकडून खंडणी मागण्यात अडथळा ठरल्या प्रकरणी ही हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला. 

'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!

कोर्टात नेमकं काय घडलं?

अनेक वेळा अवादा कंपनीकडे खंडणी मागितली जात होती, पण कंपनीने दिली नाही. यावेळीच संतोष देशमुख यांच्यासोबत वाद झाला. सरपंच देशमुख खंडणीमध्ये अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केला. डिसेंबर रोजी सुदर्शन घुले वा त्याच्यासह अन्य आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. यानंतर मारहाण करुन त्यांची हत्या केली. अपहरण केल्यानंतर विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांनी हत्येच्या आधी आणि नंतर एकमेकांना कॉल केले असल्याची माहिती सीडीआरमधून समोर आली आहे, अशी माहिती एसआयटीने कोर्टाला दिली. 

तसेच २९ नोव्हेंबर आधी सुदर्शन घुले याने अवादा कंपनीचे काम बंद पाडले होते. कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेकवेळा परळी येथील कार्यालयात बोलावून वाल्मीक कराड याने दोन कोटींचे खंडणी मागितली होती. २९ नोव्हेंबर रोजी कराड याने विष्णू चाटे याच्या फोनवरुन सुनिल शिंदे यांना फोन करुन काम बंद करण्याची धमकी दिली होती. त्याचदिवशी सुदर्शन घुले याने कंपनीत जाऊन धमकी दिली होती. ६ डिसेंबर दिवशी पुन्हा घुले साथीदारांना घेऊन कंपनीत गेला, यावेळी गार्ड व शिवाजी थोपटे यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. 

गार्ड हा मस्साजोग गावचा रहिवासी आहे, त्या दिवशी सरपंच संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी विरोध केला, खंडणीला अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख यांचा ९ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले याच्यासह साथीरांनी खून केला. या सर्व घटना होत असताना आरोपींच्या संपर्कात वाल्मीक कराड संपर्कात होतास असं सीडीआरवरुन दिसून आल्याचा दावा एसआयटीने आज कोर्टात केला.      

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिसCourtन्यायालय