शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

निकष न लावता घरकुलांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:30 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकूल योजनेत लोकसंख्येचा निकष न लावता तसेच वाढीव उद्दिष्ट मंजूर ...

बीड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकूल योजनेत लोकसंख्येचा निकष न लावता तसेच वाढीव उद्दिष्ट मंजूर नसताना घरकुले मंजूर करण्यात आली असून एकट्या बीड तालुक्यात १००८ घरकुले मंजूर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आल्यानंतर याबाबत सीईओ अजित कुंभार यांनी तपासणीचे निर्देश दिले.

रमाई घरकूल योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. तर वाढीव ३१८३ घरकुलांचा प्रस्ताव होता. वास्तविक पाहता लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी मूळ ४ हजार घरकुलांचाच विचार करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करीत वाढीव घरकूल ग्राह्य धरण्यात आले. लोकसंख्येचा निकष न लावता तसेच पंचायत समितीकडून प्रस्तावांची छाननी न करता आणि वाढीव उद्दिष्ट मंजूर नसताना घरकुले मंजूर करण्यात आल्याची बाब जि. प. सदस्य अशोक लोढा यांनी निदर्शनास आणून दिली. याप्रकरणी आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर तपासणीचे निर्देश देण्यात आले.

७० लोकसंख्येला १ घरकुले निवडीचे निकष होते. मात्र १८३६ लोकसंख्येला तब्बल १९२ घरकुले मंजूर करण्यात आली. यात एकट्या बीड तालुक्याला १००८ घरकुले १४ गावात मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या बैठकीत जलजीवन मिशनचे कृती आराखडे व अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, सभापती जयसिंह सोळंके, सविता मस्के, यशोदा जाधव, अशोक लोढा, प्रकाश कवठेकर, अविनाश मोरे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.