शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भोळसर व्यक्तीला तीन महिन्यांनंतर मिळाले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

जळगाव मजराकरांनी घडवले माणुसकीचे दर्शन तलवाडा : गेल्या तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील कालवी या गावातून निघून आलेल्या व्यक्तीस जळगाव ...

जळगाव मजराकरांनी घडवले माणुसकीचे दर्शन

तलवाडा

: गेल्या तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील कालवी या गावातून निघून आलेल्या व्यक्तीस जळगाव मजरा येथील तरुणांसह गावकऱ्यांनी चौकशी करत त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या शिवाजी चंद्रमोरे यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोच करून माणुसकीचे दर्शन घडवल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद खुणे व ग्रामस्थांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तालुक्यातील जळगाव मजरा येथे दोन दिवसांपूर्वी एक भोळसर व्यक्ती चुकून गावात आली होती. दरम्यान, यावेळी त्यांना गावातील गोविंद खुणे यांच्यासह काही तरुणांनी विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, मी शिवाजी वामन चंद्रमोरे असून, (रा. कालवी, ता. नाशिक, जि. नाशिक) या गावचा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांना जेवण खाऊ घालत गावातील मंदिरात झोपण्याची व्यवस्था केली.

नाशिक जिल्ह्यातील कालवी या गावातील सरपंच यांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून त्यांच्यामार्फत या व्यक्तीच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही खूप दिवसांपासून शोधत आहोत. त्यांना तुमच्या गावात थांबून ठेवा, आम्ही लगेच येतो. यानंतर दुसऱ्याचदिवशी त्याचे सर्व कुटुंबीय त्या व्यक्तीला नेण्यासाठी आले असता, येथील ग्रामस्थांनी त्यांना श्रीफळ, टॉवेल, टोपीचा आहेर करून सुखरूप त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.