शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

Droght In Marathwada : पावसाअभावी पिके गेली, गाव सोडायची वेळ आली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 18:49 IST

दुष्काळवाडा :  शासनाने पाण्याची सोय न केल्यास काही दिवसांत ग्रामस्थांना पाण्यासाठी गाव सोडावे लागणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केकतसारणीला भेट दिली तेव्हा ही विदारक स्थिती समोर आली.  

- दीपक नाईकवाडे, केकतसारणी, ता. केज, जि. बीड 

खरिपात पावसाने पाठ फिरविल्याने थोड्या फार प्रमाणात झालेल्या पहिल्या पावसानंतर पाऊस पडेल या आशेवर पेरणी करून कापसाची लागवड केली. मात्र पावसाळा संपला तरीही पाऊस आलाच नाही. शेतातील पिकांनी माना टाकल्या. कापूस वाळून गेला. हे कमी म्हणून की काय त्यातच गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला. गावातील दोन बोअरवेल दिवसातून दोन तास कसे बसे चालत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दिवस-रात्र एक करण्याची वेळ आली आहे. शासनाने पाण्याची सोय न केल्यास काही दिवसांत ग्रामस्थांना पाण्यासाठी गाव सोडावे लागणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केकतसारणीला भेट दिली तेव्हा ही विदारक स्थिती समोर आली.  

खरीप हंगामाच्या सुरु वातीला रिमझिम बरसल्यानंतर पाऊस पडेल या आशेवर केकतसारणीतील शेतकऱ्यांनी ५९५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, मका, तुरीसह अन्य पिकांची पेरणी केली तर कापसाची लागवड केली. पिकांनी माना वर काढल्या, मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिके शेतातच करपून वाळून गेली. सोयाबीनच्या नुसत्या काड्या शेतात दिसू लागल्या. वाळून गेलेल्या कापसाच्या पळाट्या शेतात उभ्या असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पशुसंवर्धन कसे करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतातील पिके वाळून गेल्याने शेतात काहीच काम नसल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने शेतीकामावर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

पावसाअभावी शेती नापिकी झालेली असतानाच गावात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन बोअरवेल आहेत. या बोअरवेलमध्ये विद्युतपंप टाकून पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात येते. यापैकी एका बोअरवेलची विद्युत मोटर पंधरा दिवसांपूर्वी जळाल्याने गावातील एकाच बोअरवेलवर गावचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तेथे थेंब थेंब पडणारे पाणी घागरीत भरण्यासाठी महिलांना प्रतीक्षा करावी लागते. पाणी आणण्यातच दिवस जात आहे. 

परिसरातही स्थिती सारखीचकेकतसारणी गावच्या परिसरातील आडस, मानेवाडी, चंदनसावरगाव, उंदरी या गावातही अशीच बिकट परिस्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाळा आत्ता कुठे सं्ला असून पुढील अख्खे वर्ष कसे काढायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. 

- ६८१ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य - २२. २२ या वर्षीची पैसेवारी - ३४०.०० मिमी - २०१४ मधील पाऊस - ३१४. १४ मिमी - २०१५ मधील पाऊस - ८७६.७१ मिमी - २०१६ मधील पाऊस - ८२१. ७१ मिमी - २०१७ मधील पाऊस - ४०३ .०० मिमी - २०१८ मधील पाऊस   

उत्पादनात घट होणार २५ टक्केच्या आसपास पिकांचे उत्पन्न हाती येण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोयाबीन, उडीद यांच्या उत्पादनात घट झाली असून, कापसाला पाच दहा बोंडे असल्याने कापसाचे उत्पादन घटणार आहे. तुरीची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे.    - चंद्रकांत देशमाने, तालुका कृषी अधिकारी, केज 

बळीराजा काय म्हणतो?

- पाऊस न पडल्याने शेतातील पिके गेली. गावातील दोनपैकी एकच बोअर चालू असून तो एक तास गुळण्या टाकत चालतो. अशी बिकट वेळ याअगोदर आली नव्हती. त्यामुळे पाण्यासाठी गाव उठून जाईल असंच वाटतंय. -कलावती रूपनर, माजी सरपंच 

- दोन एकर जमीन असून यावर्षी चांगला भाव मिळेल या आशेने शेतात कापूस लावला. पावसाअभावी तो उपटून टाकायची वेळ आली आहे. हाताला काम मिळत नसल्याने घरात आहे ते खाऊन दिवस काढण्याची वेळ आली आहे. - उत्तरेश्वर काळे 

-  पाऊण एकर शेतात सोयाबीन व कापसाची लागवड केली; मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतात वाळून गेलेला कापूस, सोयाबीन उपटून फेकावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दिवस-रात्र बोअरजवळ बसावे लागते. - जीवन निवृत्ती शिंदे 

- पंचमीला एकदा भुरभुर झाली. पेरणी केली. मात्र पुन्हा पाऊस पडलाच नसल्याने शेतातील पिके फुलक्यातच वाळून गेली. आता जनावरे कशी जगवायची हाच प्रश्न पडला आहे. - धनराज लक्ष्मण दहीफळे 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरी