शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Droght In Marathwada : पावसाअभावी पिके गेली, गाव सोडायची वेळ आली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 18:49 IST

दुष्काळवाडा :  शासनाने पाण्याची सोय न केल्यास काही दिवसांत ग्रामस्थांना पाण्यासाठी गाव सोडावे लागणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केकतसारणीला भेट दिली तेव्हा ही विदारक स्थिती समोर आली.  

- दीपक नाईकवाडे, केकतसारणी, ता. केज, जि. बीड 

खरिपात पावसाने पाठ फिरविल्याने थोड्या फार प्रमाणात झालेल्या पहिल्या पावसानंतर पाऊस पडेल या आशेवर पेरणी करून कापसाची लागवड केली. मात्र पावसाळा संपला तरीही पाऊस आलाच नाही. शेतातील पिकांनी माना टाकल्या. कापूस वाळून गेला. हे कमी म्हणून की काय त्यातच गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला. गावातील दोन बोअरवेल दिवसातून दोन तास कसे बसे चालत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दिवस-रात्र एक करण्याची वेळ आली आहे. शासनाने पाण्याची सोय न केल्यास काही दिवसांत ग्रामस्थांना पाण्यासाठी गाव सोडावे लागणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केकतसारणीला भेट दिली तेव्हा ही विदारक स्थिती समोर आली.  

खरीप हंगामाच्या सुरु वातीला रिमझिम बरसल्यानंतर पाऊस पडेल या आशेवर केकतसारणीतील शेतकऱ्यांनी ५९५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, मका, तुरीसह अन्य पिकांची पेरणी केली तर कापसाची लागवड केली. पिकांनी माना वर काढल्या, मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिके शेतातच करपून वाळून गेली. सोयाबीनच्या नुसत्या काड्या शेतात दिसू लागल्या. वाळून गेलेल्या कापसाच्या पळाट्या शेतात उभ्या असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पशुसंवर्धन कसे करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतातील पिके वाळून गेल्याने शेतात काहीच काम नसल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने शेतीकामावर अवलंबून असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

पावसाअभावी शेती नापिकी झालेली असतानाच गावात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन बोअरवेल आहेत. या बोअरवेलमध्ये विद्युतपंप टाकून पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात येते. यापैकी एका बोअरवेलची विद्युत मोटर पंधरा दिवसांपूर्वी जळाल्याने गावातील एकाच बोअरवेलवर गावचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तेथे थेंब थेंब पडणारे पाणी घागरीत भरण्यासाठी महिलांना प्रतीक्षा करावी लागते. पाणी आणण्यातच दिवस जात आहे. 

परिसरातही स्थिती सारखीचकेकतसारणी गावच्या परिसरातील आडस, मानेवाडी, चंदनसावरगाव, उंदरी या गावातही अशीच बिकट परिस्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाळा आत्ता कुठे सं्ला असून पुढील अख्खे वर्ष कसे काढायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. 

- ६८१ हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य - २२. २२ या वर्षीची पैसेवारी - ३४०.०० मिमी - २०१४ मधील पाऊस - ३१४. १४ मिमी - २०१५ मधील पाऊस - ८७६.७१ मिमी - २०१६ मधील पाऊस - ८२१. ७१ मिमी - २०१७ मधील पाऊस - ४०३ .०० मिमी - २०१८ मधील पाऊस   

उत्पादनात घट होणार २५ टक्केच्या आसपास पिकांचे उत्पन्न हाती येण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोयाबीन, उडीद यांच्या उत्पादनात घट झाली असून, कापसाला पाच दहा बोंडे असल्याने कापसाचे उत्पादन घटणार आहे. तुरीची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे.    - चंद्रकांत देशमाने, तालुका कृषी अधिकारी, केज 

बळीराजा काय म्हणतो?

- पाऊस न पडल्याने शेतातील पिके गेली. गावातील दोनपैकी एकच बोअर चालू असून तो एक तास गुळण्या टाकत चालतो. अशी बिकट वेळ याअगोदर आली नव्हती. त्यामुळे पाण्यासाठी गाव उठून जाईल असंच वाटतंय. -कलावती रूपनर, माजी सरपंच 

- दोन एकर जमीन असून यावर्षी चांगला भाव मिळेल या आशेने शेतात कापूस लावला. पावसाअभावी तो उपटून टाकायची वेळ आली आहे. हाताला काम मिळत नसल्याने घरात आहे ते खाऊन दिवस काढण्याची वेळ आली आहे. - उत्तरेश्वर काळे 

-  पाऊण एकर शेतात सोयाबीन व कापसाची लागवड केली; मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतात वाळून गेलेला कापूस, सोयाबीन उपटून फेकावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दिवस-रात्र बोअरजवळ बसावे लागते. - जीवन निवृत्ती शिंदे 

- पंचमीला एकदा भुरभुर झाली. पेरणी केली. मात्र पुन्हा पाऊस पडलाच नसल्याने शेतातील पिके फुलक्यातच वाळून गेली. आता जनावरे कशी जगवायची हाच प्रश्न पडला आहे. - धनराज लक्ष्मण दहीफळे 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरी