शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या आगारात सोयाबीनचे क्षेत्र कमालीचे वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : कापूस लागवडीवर होणारा जादा खर्च व सोयाबीनला मिळालेल्या चांगल्या भावाचा परिणाम म्हणून या वर्षी सोयाबीनचे ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : कापूस लागवडीवर होणारा जादा खर्च व सोयाबीनला मिळालेल्या चांगल्या भावाचा परिणाम म्हणून या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र सहा हजार हेक्टरने वाढलेले दिसत आहे. सध्या बाजारात सोयाबीन बियाण्यांची बॅग ऑनमध्येदेखील मिळणे मुश्कील झाले असून कपाशीच्या बॅगा मात्र शिल्लक असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कापसाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजलगाव तालुक्यात खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड केली जात असे. परंतु मागील १०-१२ वर्षांपासून या भागातील शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेत आहेत. या सोयाबीन क्षेत्राचा समावेश मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

मागील वर्षी माजलगाव तालुक्यात २३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. तर या वर्षी २४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल, असा कृषी विभागाचा अंदाज होता. मागील वर्षी सोयाबीनला ८ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाल्याने पुढील वर्षी भाव कमी झाला तरी एवढा कमी होईल, असे वाटत नसल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. कापसाला लागत असलेली मेहनत, खर्च, पाणी आदी पाहता सोयाबीनचे पीक कमी वेळात चांगले उत्पन्न देऊन जाते. त्यानंतर सोयाबीन काढून त्या जागेवर रब्बीचे पीकही घेता येते, असा अंदाज बांधत शेतकऱ्यांनी भर दिल्याने या वर्षी सोयाबीनचे पेराक्षेत्र २९ हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. तर कापसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

त्यामुळे कृषी विभागाने बांधलेला अंदाज पूर्णपणे फोल ठरल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम सध्या बाजारपेठेतही जाणवत आहे. सोयाबीन बियाण्यांची बॅग ऑनमध्येदेखील मिळणे मुश्कील झाले असून कापूस बियाण्यांच्या बॅगा दुकानदाराकडे मोठ्या प्रमाणात पडून असल्याचे सांगण्यात येत आहे.

------

कापूस व सोयाबीनचे बियाणे आम्ही कृषी विभागाकडून अंदाज घेऊन खरेदी करतो. या वर्षीही त्याचप्रमाणे बियाणे खरेदी करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांनी सोयाबीन पेऱ्याकडे कल दिल्याने बाजारातील बियाणे पूर्णपणे संपले होते. कापसाच्या बियाण्यास पाहिजे तसा ग्राहक न मिळाल्याने व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापसाच्या बॅगा शिल्लक आहेत. - रामानंद भंडारी, बियाणे विक्रेते

------

पावसाचे प्रमाण कमी-जास्त झाले तरी कापसाचे पीक येऊ शकते. परंतु सोयाबीनला पाणी कमी पडल्यास पीक हातचे जाण्याची शक्यता असते. या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढवल्याने बाजारातील बियाणे पूर्णपणे संपले. शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी घरचे बियाणे वापरावे.

- सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी पंचायत समिती, माजलगाव