शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलची रेंज नसल्याने अनेक गावांत अंगणवाडीला अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST

अनिल महाजन धारूर - धारूर तालुक्यातील १४३ अंगणवाड्यांचा सर्व कारभार सुरळीत करण्यासाठी मोबाईल देण्यात आले आहेत. मात्र, अनेक वाड्या-तांड्यावर ...

अनिल महाजन

धारूर - धारूर तालुक्यातील १४३ अंगणवाड्यांचा सर्व कारभार सुरळीत करण्यासाठी मोबाईल देण्यात आले आहेत. मात्र, अनेक वाड्या-तांड्यावर मोबाईलची रेंज नसल्याने ताजा कार्यालयाचा संदेश पाहण्यासाठी, नवीन काहीतरी करण्यासाठी रेंजची शोधाशोध करावी लागते. अनेकवेळा या अंगणवाडीताई मोबाईलमुळे गोंधळूनही जातात. मोबाईलचा उपयोग जेवढा होतो, तेवढीच अडचण होते. यातील अडचणी दूर झाल्या तर अंगणवाडीचा कारभार सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.

धारूर तालुक्यातील अंगणवाडीचा सर्व कारभार मोबाईलवर चालावा, यासाठी १४३ अंगणवाड्यांना मोबाईल देण्यात आला आहे. या मोबाईलवर ११ रजिस्टरचे रेकाॅर्ड अपलोड करण्याची सुविधा करण्यात आली होती. या मोबाईलद्वारे वरिष्ठ कार्यालयाचे संदेश तात्काळ मिळण्याबरोबर त्यांच्याशी संपर्क करणेही सोपे झाले होते. या मोबाईलमध्ये ११ रजिस्टरच्या नोंदीची सोय असून गावातील गरोदर मातांची नोंदणी, किशोरवयीन मुलीची नोंदणी सर्व्हे रजिस्टर, लसीकरण, अंगणवाडी स्टाॕक आदी रजिस्टरमधील अद्ययावत नोंदी या मोबाईलमध्ये ठेवण्याची सुविधा उपलब्ध असून, कारभार सुरळीत करण्यास मोठी मदत होते. मात्र, तालुका डोंगराळ असल्याने दहा ते बारा वाड्या-तांड्यावर कुठल्याच मोबाईला रेंज नसल्याने महत्त्वाचे काम असेल तर अंगणविडीताईना रेंजसाठी शोधाशोध करावी लागते. सिंगनवाडी, जायभायवाडी, पिंपरवडा, रेपेवाडी, पांचीपिंपळ तांडा, व्हरकटवाडी, मोठेवाडी ,सुरानरवाडी, निमला आदी ठिकाणी मोबाईल रेंजची मोठी समस्या आहे. या अडचणींवर मात करून अंगणवाडीताई मोबाईलवर अद्ययावत माहिती ठेवून वरिष्ठ कार्यालयास कसे सहकार्य करता येईल, याच प्रयत्नात असतात.

मोबाईलमुळे कारभार सुरळीत होण्यास मोठी मदत

- बालविकास प्रकल्प अधिकारी कदम धारूर तालुक्यात १४३ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी पाच जागा रिक्त आहेत. मात्र, सर्व अंगणवाड्यांना मोबाईल देऊन कारभार अद्ययावत व सुरळीत ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असून अडचणी सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना केली जाते, असे तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी लक्ष्मण कदम यांनी सांगितले.

तालुक्यात एकूण अंगणवाडी - १४३

अंगणवाडीसेविका - १३८

मोबाईल वितरण १४३