शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दोन तपानंतर रस्त्याचा वनवास संपतोय ; बागपिंपळगाव-तलवाडा-टाकरवण-सावरगाव रस्त्याचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST

तलवाडा : हायब्रिड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बागपिंपळगाव - तलवाडा - टाकरवण - ...

तलवाडा : हायब्रिड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बागपिंपळगाव - तलवाडा - टाकरवण - सावरगाव या रस्त्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. बागपिंपळगाव म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग ५२ पासून राजापूरपर्यंतचे काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे. काही पूल व वरील एक थर बाकी आहे. यामुळे प्रवास मात्र सुसह्य झालेला आहे.

गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होती. मोठ-मोठ्या खड्ड्यांसह खडी, धूळ व दोन्ही बाजूंनी वेढलेल्या झाडांमुळे काही ठिकाणी तर पाणंद रस्त्यासारखी अवस्था झाली होती. या भागातील ३०-४० गावांतील लोकांना प्रवास करताना मरणयातना भोगाव्या लागत होत्या. ऊस वाहतूक करणारी वाहने उलटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे यामुळे या भागात ऊस वाहतुकीस वाहने देण्यास कोणी धजावत नव्हते.

पण हायब्रीड अनिव्हिटी या योजनेअंतर्गत जवळपास दीडशे कोटी रुपये निधी मिळाल्यानंतर गतवर्षी या रस्त्याचे काम सुरू झाले. त्यानंतर कोरोना, पावसाळा यामुळे कामाची गती थोडी मंदावली होती. आता मात्र, या कामाला वेग आला असून बागपिंपळगावपासून राजापूरपर्यंतचा २५ कि.मी. रस्ता चांगला झाला असल्याने या मार्गावरील वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे.

या परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे, खडी व धुळीचा त्रास सहन करत जीव मुठीत धरुन प्रवास करायचे, पण सध्या जवळपास २५ कि.मी. रस्ता जवळपास पूर्णत्वास असल्याने वाहनधारकांत समाधान आहे.

ऊसमालकांचा जीव भांड्यात

तालुक्यातील ही गावे गोदाकाठावरील गावे म्हणून ओळखली जातात. उसाचे पाठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावांतून अनेक कारखाने ऊस नेतात, पण रस्ता खराब असल्याने वाहने उलटल्यामुळे वाहनांसह ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान व्हायचे. ऊस वाहन कारखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत ऊसमालकासह वाहनमालक चिंतेत असायचे. आता त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

१५ ते २० गावांची वाहतूक झाली सुसह्य

आजपर्यंतच्या झालेल्या कामाने १५-२० गावांतील वाहतूक सुसह्य झाली असून रस्ता पूर्ण झाल्यानंतर ४०-५० गावांची सोय होणार आहे.

वाहतूक वाढून रोजगाराच्या संधी

सावरगावपासून बागपिंपळगावपर्यंत रस्ता पूर्ण झाल्यानंतर परभणी, नांदेड, लातूर, माजलगावहून जाणारी वाहने अंतर कमी होत असल्याने सावरगाव-राजेगाव-टाकरवण तलवाडामार्गे औरंगाबादकडे जातील. यामुळे या रस्त्यावर हाॅटेल, रसवंतीसह इतर व्यवसाय वाढून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.