शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्ध्व कुंडलिका मध्य प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

राम लंगे वडवणी : ऊर्ध्व कुंडलिका धरणाची पाणी पातळी ५३६.१० मीटर झाली असून धरणातील उपयुक्त साठा ८४ टक्के इतका ...

राम लंगे

वडवणी : ऊर्ध्व कुंडलिका धरणाची पाणी पातळी ५३६.१० मीटर झाली असून धरणातील उपयुक्त साठा ८४ टक्के इतका झालेला आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा धरणाच्या ऊर्ध्व भागातील पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेनुसार धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्याच्या अनुषंगाने ठरविण्यात येणार आहे. कुंडलिका नदीकाठावरील शेतकरी, नदीकाठावर वस्ती करून राहिलेले नागरिक यांना सावधतेचा इशारा दिला असून जेणेकरून जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

तालुक्यात असलेल्या, वरदान ठरलेल्या ऊर्ध्व कुंडलिका धरणात गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. धरणात २० जुलै रोजी ९० टक्के पाणीसाठा असून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे हे धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोणत्याहीक्षणी या धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना आणि नदीशेजारी वस्ती करून राहणाऱ्या लोकांना जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. वडवणी तालुका हा कायम दुष्काळाच्या खाईत असायचा. मात्र अप्पर ऊर्ध्व कुंडलिका धरणामुळे या तालुक्याचे नंदनवन झाले आहे .या प्रकल्पातील प्रकल्पीय पूर्ण साठा क्षमता १८.७७ द.श.घ.मी. असून जलाशयाची पूर्ण पाणी पातळी ५३७ मीटर आहे. या प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा १५.५७ असून २० जुलै रोजी या धरणात ५३६.४६ पाणीसाठा आहे.

तालुक्यातील जवळपास २ हजार ८०० हेक्टर शेती या धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते. २० जुलैला या धरणात ५३६.४५ मीटर इतका पाणीसाठा झाला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून या धरणात पाण्याची वेगाने वाढ होत असल्यामुळे येणारे पाणी हे कुंडलिका नदीपात्रात सोडावे लागणार आहे.

याबाबत बीड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अजय गुजर म्हणाले की, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) अतिवृष्टी होण्याची शक्यता असून धरणात येणाऱ्या येव्यामुळे (Inflow) धरण निर्धारित पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर येणारा येवा कुंडलिका नदीपात्रात सोडावा लागणार आहे. धरणात येणारा येवा पाहता, आजच्या ५३६.४५ मीटर या पातळीनंतर येणाऱ्या येव्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे.

याबाबत तहसीलदार प्रकाश सिरसेवाड म्हणाले की, काल तलावाची पाहणी केली असून ते जवळपास ९० टक्के भरलेले आहेत. ९० टक्के धरणाची पातळी ५३६.४५ असून कधीही पाऊस पडला की धरणातून पाणी सोडले जाईल. नदीकाठावरील गावांतील नागरिकांना याबाबत कळविले आहे

200721\img-20210720-wa0023.jpg

ऊर्ध्व कुंडलिका मध्य प्रकल्पात 89.95% पाणीसाठा पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रकल्पाचे छायाचित्र