शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत तीन दिवसात कोरोनाचे २४ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दीड महिन्यात कमी झालेली रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. तीन दिवसात कोरोनाचे एकूण २४ रूग्ण ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दीड महिन्यात कमी झालेली रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. तीन दिवसात कोरोनाचे एकूण २४ रूग्ण आढळले आहेत. मंगळवारी तालुक्यात एकूण १० पैकी अंबाजोगाई शहरात ८ रुग्ण निष्पन्न झाले. तर बुधवारी ११ आणि गुरूवारी ३ रूग्ण आढळल्याने धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

एप्रिल व मे महिन्यात अंबाजोगाई तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. अंबाजोगाई तालुक्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. तालुक्यात आजपर्यंत १३ हजार ८६३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शहरात नवीन व सहवासितांची रुग्णांच्या संख्येत भरच पडू लागली आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात अजूनही रुग्णांवर उपचार सुरूच आहेत.

सार्वजनिक ठिकाणी नेहमी गर्दी

अशा स्थितीत ही शहरवासीयांना कोरोनाचे गांभीर्य नाही. शहरात सार्वजनिक ठिकाणी अजूनही गर्दी कायम आहे. शासनाने बाजार बंद केले असले तरी रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे विक्रेते कसल्याही प्रकारचे बंधन पाळत नसल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. शासनाने विनामास्क फिरणाऱ्यांकडून हजारो रुपये दंड वसूल केला तरी परिस्थिती ‘जैसे थे’ च होऊ लागली आहे. अशी स्थिती राहिली तर अंबाजोगाई शहर बंद ठेवण्याचा पर्याय शासनासमोर राहणार आहे.

त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष

ग्राहक, व्यापाऱ्यांचे मास्क वापराकडे दुर्लक्ष होत असल्याने अंबाजोगाई शहरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे पालन व्यापारी व ग्राहकांकडून होत नाही. मास्कच्या वापराकडे कमालीचे दुर्लक्ष केले जाते. सामाजिक अंतर पाळले जात नाही. कोरोनाबाबतची त्रिसूत्री पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

तर कायदेशीर कारवाई

शहरातील नागरिकांनी वेळीच गांभीर्य ओळखून कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. नसता मास्क न वापरणाऱ्या, शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी दिला आहे.