शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख लिटर पाणी रस्त्यावर !

By admin | Updated: May 14, 2014 00:27 IST

सोमनाथ खताळ , बिंदूसरा धरणातून दररोज १५ लाख लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सोमनाथ खताळ , बीड पाणीटंचाईमुळे बीडकरांना आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असतानाच बिंदूसरा धरणातून दररोज १५ लाख लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून यातून सतत पाणी वाहत असले तरी याचे गांभीर्य मात्र संबंधितांना नसल्याचेच दिसत आहे. गेली अनेक महिन्यांपासून पाण्याचा हा अपव्यय सुरूच आहे. बीड शहराला सध्या तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेली वर्षभरापासून बीडकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पिण्यासाठी अगदी दररोज विकतचे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. वर्षभरात ही परिस्थिती बदलली नाही. आजही शहरातील अनेक नागरिकांना पिण्याचे पाणी विकतच घ्यावे लागत आहे. येथील प्रकल्पात हिरवे पाणी असल्याचे ‘लोकमत’ने पालिकेला दाखवून दिले होते. याची नगर परिषदेने दखल घेत मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एम.एस.वाघ आणि दुधाळ यांना सोबत घेऊन या धरणाची पाहणी केली होती व प्रत्येक आठ तासाला २५ किलो तुरटी पाण्यात टाकण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता बीडकरांना शुद्ध पाणी पुरवठा होत आहे. परंतु लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे मागील अनेक महिन्यांपासून बिंदुसरा धरणाच्या भिंतीला भलेमोठे भगदाड पडले असून यामधून दररोज १५ ते २० लाख लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच या धरणाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात मोठ मोठी झाडे उगवली आहेत. या झाडांच्या मुळ्या भिंतीत गेल्याने यातून पाण्याचा पाझर होत आहे. मागील अनेक वर्षापासून या धरणाच्या भिंतीची दुरूस्ती केली नसल्याचे तेथील एका कर्मचार्‍याने सांगितले. हजारो लोकांची भागू शकते तहान बिंदुसरा धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडातून दररोज १५ ते २० लाख लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे. या वाया जाणार्‍या पाण्यावर शहरातील हजारो नागरिकांची तहान भागू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले. म्हणे ! दोन महिन्यांपूर्वी केली पाहणी बिंदुसरा धरणाला पडलेल्या भगदाडाची दोन महिन्यापूर्वी नाशिक येथील पथकाने पाहणी केली असून या भिंतीची लवकरच दुरूस्ती करण्यात येईल, असे शाखा अभियंता डी.एम.कोकणे यांनी सांगितले. दोन महिन्यापासून अद्यापही या भिंतीची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भिंतीच्या दुरूस्तीला कधी मुहूर्त लागणार? पावसाळ्यात की धरणातील पाणी संपल्यावर? असा प्रश्न यानिमित्ताने सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत मुख्याधिकारी निलावाड म्हणाले, आम्ही याबाबत संबंधित विभागाला पत्र पाठविलेले आहे.