शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

New Traffic Rules: गाडी घेऊन बाहेर जाताय, PUC चेक करा अन्यथा खिशाला बसणार मोठा भूर्दंड

By प्रविण मरगळे | Published: October 24, 2020 11:12 AM

New Traffic Rules News: जेव्हा गाडी प्रदूषण नियंत्रणाच्या मानदंडांची पूर्तता करते तेव्हा गाडी मालकास पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते

ठळक मुद्देनवीन वाहनासाठी पीयूसी प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. वाहन नोंदणीच्या एका वर्षानंतर पीयूसी प्रमाणपत्र घेणे आवश्यक या प्रमाणपत्राच्या मदतीने वाहनांचे प्रदूषण नियमांनुसार होते की नाही याची पडताळणी होते. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाहीदहापट दंड वाढीमुळे दिल्लीतील सुमारे १ हजार पीयूसी केंद्रांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती

नवी दिल्ली – जर तुमच्याकडे वाहनासाठी लागणारं प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र नसल्यास पुढील वेळी रस्त्यावर गाडी आणल्यानंतर तुम्हाला मोठा भूर्दंड बसणार आहे. पीयूसी नसेल तर १० हजार रुपये दंड भरावा लागेल. मागील वर्षी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने नियमात बदल केला असून दंडाच्या रकमेत दहा पट वाढ केली आहे. पूर्वी पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर फक्त एक हजार रुपये दंड भरण्याची तरतूद होती, परंतु सरकारने ती वाढवून १० हजार रुपये केली आहे.

पीयूसी म्हणजे काय?

जेव्हा गाडी प्रदूषण नियंत्रणाच्या मानदंडांची पूर्तता करते तेव्हा गाडी मालकास पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्या मदतीने वाहनांचे प्रदूषण नियमांनुसार होते की नाही याची पडताळणी होते. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही. सर्व वाहनांना वैध पीयूसी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते. नवीन वाहनासाठी पीयूसी प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. वाहन नोंदणीच्या एका वर्षानंतर पीयूसी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. हे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागेल.

१ हजार ते १० हजार दंड

१ सप्टेंबर २०१९ पासून दिल्लीमध्ये लागू झालेल्या सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत वैध पीयूसी प्रमाणपत्र नसल्याबद्दल दंड १ हजार रुपयांवरून १०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. दहापट दंड वाढीमुळे दिल्लीतील सुमारे १ हजार पीयूसी केंद्रांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परिवहन विभागाने त्या महिन्यात तब्बल १४ लाख पीयूसी प्रमाणपत्रे दिली.

'पीयूसी नसेल तर विमा नाही'

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विमा कंपन्या वैयक्तिक विमा पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी वैध पीयूसीची पडताळणी करतात. आयआरडीएने २० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात असं म्हटलं आहे की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) दिल्ली आणि एनसीआरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. म्हणूनच, या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सुनिश्चित केले पाहिजे. जुलै २०१८ मध्ये वाढत्या वाहनांच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना निर्देश दिले होते. पीयूसी प्रमाणपत्र सादर करेपर्यंत वाहन विमा पॉलिसीचे नूतनीकरण करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीpollutionप्रदूषणcarकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय