शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

राज्यात टॅंकरवारी सुरूच; ३,२९१ गाववाडे तहानलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 3:32 PM

मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

अमरावती : मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जूनच्या तिस-या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस झाल्यानंतर ही परिस्थिती पालटण्याचे संकेत आहेत. तथापि, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थिती आटोक्यात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.गतवर्षी १२ जूनला १,७९८ गावे आणि ४,२८१ गावांना १,६६६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. यंदा टँकरची संख्या वाढली असली तरी टंचाईग्रस्त गाववाड्यांच्या संख्येमध्ये कपात झाली आहे.कोकणातील पाच जिल्ह्यांतील २२७ गावे व ६३० वाड्यांमध्ये १०५ टँकरने, नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील ३१६ गावे व ३५८ वाड्यांमध्ये २६४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील ४३० गाववाड्यांमध्ये ७५ टँकर, औरंगाबाद विभागातील ९५३ गाववाड्यांमध्ये सर्वाधिक ९६२ टँकरने, तर नागपूर विभागातील ४१ गावांमध्ये ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. अमरावती विभागातील ३३६ गावांमध्ये ३३० टँकरने पाणी पुरविले जात आहे. अर्थात राज्यातील १,७८५ गावे व १,५०६ वाड्यांमध्ये १९९ शासकीय टँकर व १,५७८ खासगी अशा १७७७ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही आकडेवारी ११ जूनपर्यंतची आहे.

१९.०२ टक्के उपयुक्त जलसाठाराज्यातील ३,२४६ जलाशयांमध्ये १२ जूनअखेर केवळ १९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यात अमरावती प्रदेशातील एकूण ४४३ प्रकल्पांमध्ये १६.३४, कोकणातील १७५ प्रकल्पांमध्ये ४०.३४, नागपूरमधील ३८५ प्रकल्पांमध्ये ११.३३, नाशिकमधील ५६१ प्रकल्पांमध्ये १९.६६, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये १७.२९ टक्के, तर मराठवाड्यातील ९५७ प्रकल्पांमध्ये केवळ १८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणेAmravatiअमरावतीMarathwadaमराठवाडाnagpurनागपूरNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रMonsoon Specialमानसून स्पेशल