शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

By विश्वास मोरे | Published: April 28, 2024 8:13 PM

'विरोधकांना पराभवाची भीती वाटत असल्याने हे प्रकार सुरू आहेत.'

पिंपरी:  राज्यात महाविकास आघाडीसाठी सकारात्मक वातावरण आहे. शिरूर आणि बारामती मतदारसंघात विरोधकांकडून मतदारांना धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसी बळाचा चुकीचा वापर केला जात आहे. विरोधकांना पराभवाची भीती वाटत असल्याने हे प्रकार सुरू आहेत, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. 

महाविकास आघाडीच्या मेळाव्यासाठी ते आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी उमेदवार संजोग वाघेरे, काँग्रेस पक्षाचे कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, एकनाथ पवार, योगेश बाबर उपस्थित होते. गद्दारीचे कीड पूर्णपणे निघून जावीराऊत म्हणाले, 'राज्यात प्रत्येक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. कारण त्यांचा जीव राज्यातील ४८ जागांमध्ये अडकला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागा देशातील चित्र बदलवू शकतात. समोर उभी असलेली लोक गद्दार आहेत. त्यांचा पराभव करणे हेच आपले ध्येय आहे. या राज्यात पुन्हा आमदार खासदार विकत घेतला जाऊ नये, गद्दारीचे कीड पूर्णपणे निघून जावी, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.''   

निवडणूक आयोगावर टीका राऊत म्हणाले, निवडणूक आयोग ही भाजपची दुसरी शाखा आहे. देशात ज्या काही सांविधानिक संस्था आहे त्या स्वतःच्या ताब्यात घेण्याचे काम मोदींनी केले आहे. त्या आता सांविधानिक राहिल्या नाहीत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सरकारी फौजफाटा घेऊन एका पक्षाचा प्रचार करत आहे. हा तर खऱ्या अर्थाने आचारसंहितेचा भंग आहे.'

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sanjay Rautसंजय राऊतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड