शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

विदर्भातील वाघांचे सह्याद्रीत होणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 5:07 PM

आता विदर्भातून आठ वाघ स्थलांतर होणार असल्याने सह्याद्रीच्या वन्यसंपदेत भर पडेल, यात दुमत नाही.

ठळक मुद्देकेंद्र शासनाकडे प्रस्तावताडोबा येथील आठ वाघ पाठविण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानव- वन्यजीव संघर्षाची पार्श्वभूमी बघता विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्री अभयारण्यात स्थलांतर केले जाणार आहेत. त्यानुसार राज्याच्या वनविभागाने प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. यासंदर्भात वनमंत्री संजय राठोड यांच्याशी वनविभागाने चर्चा केली.विदर्भात वाघांची संख्या वाढत चालली आहे. विशेषत: पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त वाघ असल्याने त्यांना संचारासाठी जंगलक्षेत्र अपुरे पडत आहे. परिणामी मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी उडत आहे. विदर्भातील वाघ हे उष्ण कटिबंधीय प्रदेशातील असून, त्यांना दऱ्या, डोंगराची सवय नाही. त्यातुलनेत सह्याद्री अभयारण्य हे थंड प्रदेशातील आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर असा मोठा भाग मुंबई पश्चिम वन्यजीव विभागाशी जोडण्यात आला आहे. भौगलिकदृष्ट्या दऱ्या, खोऱ्यांनी वेढलेला असून, हल्ली सह्याद्रीत पाच ते आठ वाघ असल्याची नोंद आहे. १५०० चौरस किमीचा हा प्रदेश निसर्गरम्य वातावरणाने नटलेल्या आहे. आता विदर्भातून आठ वाघ स्थलांतर होणार असल्याने सह्याद्रीच्या वन्यसंपदेत भर पडेल, यात दुमत नाही. सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करण्यापूर्वी त्या भागातील गावांच्या ग्रामपंचायतींची ना-हरकत घ्यावी लागणार आहे. प्रक्रिया फार किचकट असल्याने सहजतेने वाघांचे स्थलांतर करणे सोपे नाही, अशी वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.तीन ते पाच वर्षाचे वाघ स्थलांतरणाची प्रक्रियाविदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात हल्ली क्षमतेपेक्षा जास्त ५० वाघ असल्याची माहिती आहे. त्यामुळे सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करताना ३ ते ५ वयोगटातील वाघांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. प्रथम एक किंवा दोन वाघ सह्याद्रीत स्थलांतर केल्यानंतर त्यांचे मॉनिटरिंग करण्यात येईल. हे वाघ सह्याद्रीत रमले की नाही, या निरीक्षणाअंती पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.वनसचिव मुख्यमंत्र्यांना देणार प्रस्तावविदर्भातील वाघांचे स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव वनसचिव हे राज्य वन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविला जाणार आहे. त्यापश्चात व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्णत्वास येईल. सर्वोच्च न्यायालयालासुद्धा वाघांच्या स्थलांतरणाची माहिती द्यावी लागणार आहे.

वनमंत्र्यांशी वाघांच्या स्थलांतरणाबाबत चर्चा झालेली आहे. राज्य वन मंडळात याविषयी लवकरच मंथन होणार आहे. वाघांच्या स्थलांतरणासाठी अन्य पर्यायदेखील आहेत.- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), नागपूर.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव