शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांतच जिल्ह्यात आत्महत्येचे शतक

By admin | Updated: February 23, 2015 00:55 IST

सततच्या नापिकीमुळे शेतकरी वैतागला आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने विशेष पॅकेजही घोषित केले.

सुरेश सवळे  चांदूरबाजारसततच्या नापिकीमुळे शेतकरी वैतागला आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने विशेष पॅकेजही घोषित केले. मात्र त्याचा परिणाम जाणवत नाही. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात वर्षाच्या दीड महिन्यात १११ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात गत चार वर्षांतील ४० टक्के आत्महत्या सरकारी मदतीला पात्र ठरल्या. त्याचा सर्वाधिक फटका अमरावती व वाशिम जिल्ह्याला बसला. याची दखल राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने घेत राज्याच्या मुख्य सचिवांना दोन आठवड्यात खुलासा करण्याचे नोटीसीद्वारे बजावले आहे. यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात २०११ ते २०१४ या चार वर्षात ३ हजार ७१६ तर चालू वर्षाच्या दीड महिन्यात १११ अशा ३ हजार ८२७ शेतकरी आत्महत्या झाल्यात. यापैकी एक हजार ८८९ शेतकरी आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्या. शासकीय मदतीस पात्र प्रकरणाची टक्केवारी पाहता अमरावती ३५ टक्के, वाशिम ३६ टक्के, यवतमाळ ३८ टक्के, बुलडाणा ६० टक्के तर अकोला ५० टक्के आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास त्याचा कुटुंबियांना एक लाखाची सानुग्रह आर्थिक मदत केली जाते. त्यातही त्याला केवळ ३० हजार रुपये रोख दिले जाते तर ७० हजारांचा सहा वर्षांचा बाँड दिला जातो. हा बाँड तहसीलदारांच्या नावे असतो. मध्यंतरी ५० हजारांची अतिरिक्त मदत केंद्रशासनाकडून देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याची अमलबजावणी अद्यापही झालेली नाही. तालुकास्तरावर गठीत केलेल्या शेतकरी आत्महत्या निवारण समितीचा निर्णयसुध्दा या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. या समितीच्या सिफारशीनुसारच पात्र-अपात्रतेच्या निकर्ष काढला जातो. गेल्या चार वर्षांत ५ हजार ६९८ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद शासनदप्तरी आहे. त्यापैकी ३ हजार ८२७ शेतकरी आत्महत्या अमरावती सह वर्धा जिल्हा या सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात झाल्या तर १ हजार ८७१ आत्महत्या राज्याच्या इतर भागात झाल्या. यात २ हजार ७३१ आत्महत्या मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्या. त्यात विदर्भातील ६४० अपात्र ठरविण्यात आल्या. २०१२ मध्ये ९५० पैकी ५१६ अपात्र. २०१३ मधील ८०५ पैकी ३९७ अपात्र. २०१४ मधील ९६२ पैकी ३३० अपात्र तर २०१५ च्या सुरुवातीचा दीड महिन्यात १४९ शेतकरी आत्महत्या झाल्या, त्यात ६ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.