शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीहून दर्यापूर मार्गे अकोल्याला प्रथमच ‘शिवशाही’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला. दृष्ट लागावी असा हा रस्ता झाल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास कुणालाही आवडेल. आतापर्यंत दर्यापूरवरून एसटी महामंडळाच्या  साधारण (लाल) बस अकोलाकरिता सुटायच्या.

ठळक मुद्देविभाग नियंत्रकाची माहिती, मंगळवारपासून फेरी, जिल्ह्यातून सहा बस धावणार

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘लाल परी’नंतर प्रवाशआंची सर्वाधिक पसंती लाभलेल्या शिवशाही बस मंगळवारपासून अमरावती मध्यवर्ती आगारातून इतर जिल्ह्यांत सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. एकूण सहा बसपैकी एक अमरावतीहून अकोल्याला दर्यापूर, म्हैसांग मार्गे प्रथमच सुरू करण्यात येत आहे. हा रस्ता ही महिन्यांपूर्वीच गुळगुळीत झाला आहे.अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला. दृष्ट लागावी असा हा रस्ता झाल्यामुळे या मार्गाने प्रवास करण्यास कुणालाही आवडेल. आतापर्यंत दर्यापूरवरून एसटी महामंडळाच्या  साधारण (लाल) बस अकोलाकरिता सुटायच्या. मात्र, आता रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे या मार्गावरुन प्रवासी व वाहनांची संख्या वाढली आहे. दर्यापूरहून जाणारे नोकरदार व किराणा व्यावसायिकांची बाजारपेठसुद्धा अकोला आहे. त्यामुळे शिवशाही बसला या मार्गावर प्रवासी मिळतील, हे निश्चित. मंगळवारी सकाळी ८ वाजता शिवशाही बस अमरावतीहून निघेल. ९.३० वाजता ही बस दर्यापूवरून अकोल्याला रवाना होईल. या मार्गावरील हा पहिलाच प्रयोग आहे. 

नागपूरकरिता चार शिवशाही बस अमरावती मध्यवर्ती आगारातून सहा शिवशाही बस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. यामध्ये चार शिवशाही बस नागपूरकरिता, तर दोन अकोल्याकरिता सोडल्या जातील. ॲनलॉकमध्ये प्रवासी संख्या वाढल्यानंतर बस वाढविण्यात येतील. 

पूर्वी व्हायच्या १७०० फेऱ्या कोरोनापूर्वी जिल्ह्यातील ३७५ बसच्या १६०० ते १७०० फेऱ्या व्हायच्या. यामध्ये ७३ शिवशाही बस आहेत. आता कोविड नियमावलीनुसार १५० ते २५० बस विविध मार्गांवर सोडण्यात येणार असून, त्याच्या ५०० ते ६०० फेऱ्या होणार आहेत. सोमवारपासून जिल्हा व तालुका पातळीवर बस सोडण्यात येतील. तूर्तास ग्रामीण भागात बस धावणार नसल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी स्पष्ट केले. 

एसटीला रोज ३० लाखांचा फटकाकोरोना काळापूर्वी एसटीला रोज ३० ते ३५ लाखांचे उत्पन्न मिळायचे. मात्र, पहिल्या लॉकडाऊनमध्ये सहा महिने एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येसुद्धा प्रवासी नव्हते. आता अनलॉकमध्ये फक्त दोन ते तीन लाखांचे उत्पन्न मिळत आहे. एसटीला दररोज ३० ते ३२ लाखांचा फटका बसत आहे.

 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी