शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

सात दशलक्ष लिटर पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: June 29, 2015 00:34 IST

सिंभोरा धरणातून ११८ दशलक्ष लिटर पाण्याची उचल दररोज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून केली जाते.

पाईपलाईनला गळती : शहरातही दररोज ३० टक्के पाण्याची नासाडीवैभव बाबरेकर अमरावतीसिंभोरा धरणातून ११८ दशलक्ष लिटर पाण्याची उचल दररोज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून केली जाते. मात्र, हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सात दशलक्ष लिटर पाण्याची गळती होत आहे. शहरातही दररोज ३० टक्के पाण्याचा गळतीमुळे अपव्यय होत आहे. एकीकडे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे घसा कोरडा करून सांगितले जाते, तर दुसरीकडे कितीतरी पाण्याची अशी विनाकारण नासाडी होत आहे. जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई उद्भवते. अनेक ठिकाणी तर पावसाळा, हिवाळ्यातही पाणीटंचाई भासते. मात्र, तरीही पाण्याचा हा अपव्यय रोखला जात नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत दररोज सिंभोरा धरणातून ११८ दशलक्ष लिटर पाण्याची उचल करून अमरावती शहराला दररोज ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, विनाकारण होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्याचे प्रयत्न होेत नाहीत. गळतीमुळे दूषित पाणीपुरवठासिंभोरा धरणातील पाणी जलशुध्दीकरण केंद्रावर शुध्द होते. मात्र, तेथून शहरात पाणी पुरवठा करताना होणारी गळती, पाणी चोरी, अपव्यय व नाल्यातून गेलेल्या लिकेज पाईपलाईनमुळे पाणी दूषित होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. चोरी न करता अधिकृत नळजोडणी करून घेणे आवश्यक आहे. सिंभोरा धरणातून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा होतो. दरम्यान पाईप लाइनमधून सात दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया जाते. पाणी गळती रोखण्याचा प्रयत्न जीवन प्राधिकरणमार्फत होत आहेत.- डी.एन. आमले, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण