शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

आरटीई ७९७ प्रवेश रद्द १६५९ मुलांना मिळाला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 5:00 AM

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत आतापर्यंत २ हजार ४५६ पैकी १,६५९ प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील २४३ शाळांत आरटीईच्या २,४८६ जागांसाठी ९००३ अर्ज प्राप्त झाले. त्यातील सोडतीच्या पहिल्या फेरीत २,३५० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत केवळ १,६५९ पाल्यांचे प्रवेश निश्चित झालेत. निवड यादीतील प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाकडे जवळपास ३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विभागाने तक्रारीचे अनुषंगाने निवड यादीतील ३० पालकांची तपासणी केली असता, २ तक्रारींचा निपटारा करण्यात आला.

ठळक मुद्देशिक्षण हक्क कायदा : नऊ हजार तीन विद्यार्थ्यांचे अर्ज

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आरटीई अंतर्गत आतापर्यंत २ हजार ४५६ पैकी १,६५९ प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील २४३ शाळांत आरटीईच्या २,४८६ जागांसाठी ९००३ अर्ज प्राप्त झाले. त्यातील सोडतीच्या पहिल्या फेरीत २,३५० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत केवळ १,६५९ पाल्यांचे प्रवेश निश्चित झालेत. निवड यादीतील प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाकडे जवळपास ३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विभागाने तक्रारीचे अनुषंगाने निवड यादीतील ३० पालकांची तपासणी केली असता, २ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. निवड यादीतील २८ जणांच्या तपासणीपैकी २२ पाल्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले. याशिवाय प्रतीक्षा यादीतील ५४ पालकांची तपासणी केली असता, त्यातील ३० पाल्यांचे प्रवेश विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले. शिक्षण विभागामार्फत आरटीई अंतर्गत आथिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिलीत एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे मोफत प्रवेश प्रक्रियादेखील प्रभावित झाली. मार्च महिन्यात पुणे येथे पहिली सोडत काढण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील २३५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात केल्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र या मुदतीत सोडतीतील २३५० पैकी १६५९ बालकांचेच प्रवेश झाले. काहींचे प्रवेश विविध कारणांमुळे होऊ शकले नाही. त्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, यामध्ये अद्याप एकही प्रवेश झालेला नाही.आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पालकाकडून शिक्षण विभागाकडे ३० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २ तक्रारींचा निपटारा झाला. उर्वरित २८ तक्रारींची पडताळणी करून २२ पाल्यांचे प्रवेश रद्द झाले. प्रतीक्षा यादीतील ५४ पालकांची तपासणी केली असता, यात दोषी ३० पाल्यांचे प्रवेश रद्दची कारवाई सीईओंच्या मार्गदर्शनात करण्यात आली.२४५६ पैकी १६५९ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. प्रतीक्षा यादीतील प्रवेशप्रक्रिया २३ ऑक्टोबरपर्यंत राबविली जाईल. सीईओंच्या आदेशानुसार पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम ठेवून अपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले आहेत.- ई.झेड खान, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Educationशिक्षण