शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबारा, सर्व्हरवर लोड

By admin | Updated: February 25, 2016 00:10 IST

शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आॅनलाईन सातबारा जिल्ह्यात सुरू करण्यात आला. मात्र सर्व्हरवरील लोड वाढून ही वेबसाईट वारंवार हँग होत आहे.

अभिलेख अद्ययावतीकरण : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढलीअमरावती : शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आॅनलाईन सातबारा जिल्ह्यात सुरू करण्यात आला. मात्र सर्व्हरवरील लोड वाढून ही वेबसाईट वारंवार हँग होत आहे. त्यामुळे सातबारा काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. परिणामी आॅनलाईन सातबारा तलाठ्यासाठी व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय भूमिलेख अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत सातबारा, सहा ‘ ड’ व आठ ‘अ’ स्कॅन करुन डाटा एन्ट्री करण्यात जिल्ह्याने बाजी मारली. दोन वर्षांपासून याचे काम सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासून धुळखात पडलेले स्कॅन करुन सीडी तयार करण्यात आल्या. पुणे येथे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे त्या पाठविण्यात आल्या. सीडीमधील दस्तऐवज या कार्यालयाने शासनाच्या ‘महाभुलेख महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यात अमरावती व एक, दोन तालुके वगळता उर्वरित तालुक्यामधील सातबारा, सहा ‘ड’ व आठ ‘अ’ वेबसाईटवर उपलब्ध झाले. मात्र ही वेबसाईट वारंवार हँग होते. त्यामुळे काही क्षणात उपलब्ध होणारा सातबारा मिळण्यास बराच अवधी लागत आहे. परिणामी एका चकरेत शेतकऱ्यांचे काम होत नाही. सातबाऱ्यासाठी सर्व्हरवरील लोड कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागते. सरकारच्या डिजीटल इंडिया उपक्रमाव्दारे इतरही सेवा महा ई-सेवाकेंद्राच्या माध्यमातून गावात पोहचल्या. पण ही यंत्रणा सुरळीत चालावी, यासाठी हवे असणारे नेटचे जाळे सरकारने उपलब्ध केले नाही. सातबाऱ्याची भूमीअभिलेख ही वेबसाईट याचे मुर्तीमंत उदाहरण आहे. ही वेबसाईट मुंबई येथील सर्व्हरशी जोडलेली आहे. संपूर्ण राज्यासाठी हे एकमेव सर्व्हर आहे. त्याची क्षमता देखील कमी आहे. संकेतस्थळाला २०० हून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्यास ती हँग होते, असा अनुभव आहे. सर्व्हरवर लोड झाल्यानंतर ते डाउन होते. यामुळे आधुनिक युगातही सरकारची ही यंत्रणा तांत्रिक मागासलेपणाचे दर्शन घडवीत आहे. ग्रामीण भागात रेंज नसल्यामुळे आॅनलाईन सेवांचा डोलारा कोसळला असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळते. (प्रतिनिधी)रेंजसाठी विजेची बोंबरेंज मिळाली तर लाईटची बोंब, वेबसाईटवरुन सातबाऱ्याची प्रिंट देता यावी, यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे लॅपटॉप आहेत. यासाठी प्रशासनाने डोंगल दिले आहेत. लॅपटॉपला डोंगल जोडून वेबसाईटवरुन डिजीटल स्वाक्षरीची प्रिंट दिली जाते. ही प्रिंट देण्यासाठी रेंज मिळत नाही. आणि रेंज मिळाली तर वीज गायब होते, असे चित्र आहे. तलाठ्यांचे दफ्तर सरकारजमाआॅनलाईन सातबारा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हस्तलिखित सातबारा, सहा ‘ड’, आठ ‘अ’ देणे बंद झाले आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांचे दफ्तर सरकार जमा करण्यात आले आहे. परंतु ग्रामीण भागात वेबसाईटवर सुरू होत नसल्याने तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.