शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

२८ लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर( असायमेंट)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST

अमरावती/ संदीप मानकर जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे नागरिकांच्या अन्न व औषधीसंदर्भाच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. औषधी प्रशासन ...

अमरावती/ संदीप मानकर

जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे नागरिकांच्या अन्न व औषधीसंदर्भाच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. औषधी प्रशासन विभागाच्यावतीने काही प्रमाणात कारवाई केली जाते. मात्र, अन्न विभागात मनुष्यबळाच्या तुटवड्यामुळे कारवाया मंदावल्या असून, फारच कमी हॉटेल, रेस्टॉरेंटची तपासणी होते. यामुळे जिल्ह्यातील २८ लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर सोडली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरेंटवर कारवाई केली जात नसल्याने कमी दर्जाच्या व भेसळयुक्त अन्नाची विक्री होते. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

औषधी प्रशासन विभागाकडे औषध निरीक्षकांच्या चार जागा मंजूर असून, त्यापैकी फक्त एकाच निरीक्षकाकडे जिल्ह्याची धुरा आहे. जिल्ह्यात दोन हजार मेडिकल स्टोअर असून, गतवर्षी त्यापैकी ३४० प्रतिष्ठानांचीच तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोषी आढळलेल्या ४३ मेडिकल स्टोअरचे निलंबन करण्यात आले. जिल्ह्यात परवानाधारक ८९ हॉटेल, ४०२ रेस्टॉरेंट आहेत, तर २३८ हॉटेल व ७०२ रेस्टॉरेंट अन्न प्रशासन विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यापैकी वर्षभरात फक्त १२ हॉटेलवर तपासणीअंती कारवाई केली गेली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सहा जागा मंजूर असून, त्यापैकी चारच अधिकारी कार्यरत आहेत.

बॉक्स:

मेडिकल स्टोअरची तपासणी होते, हॉटेलची का नाही?

औषधी प्रशासन विभागाकडे चार जागा मंजूर आहेत. त्यापैकी फक्त एकच औषधी निरीक्षक कार्यरत आहेत. त्यांच्यावरही यवतमाळ येथील सहायक आयुक्तांचा अतिरिक्त प्रभार आहे. तरीही ३४० मेडिकल स्टोअरची तपासणी वर्षभरात करण्यात आली. ४३ परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले. मात्र, अन्न प्रशासन विभागाकडे चार निरीक्षक असतानाही हॉटेलची तपासणी का करण्यात येत नाही, असा प्रश्न समोर आला आहे.

बॉक्स:

वर्षभरात १२ हॉटेलचालकांवरच कारवाई

हॉटेलमध्ये स्वच्छता ठेवली जाते किंवा नाही, तेथे कमी दर्जाच्या अन्न पदार्थांची साठवणूक किंवा विक्री होते का, या मुद्द्यांवर अन्न प्रशासन विभागाला कारवाईचा अधिकार आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असले तरीही वर्षभरात फक्त १२ हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरेंटची फारशी तपासणी करण्यात येत नसल्याची बाब पुढे आली आहे.

बॉक्स:

न्यायालयीन प्रक्रियेतसुद्धा जातो वेळ

अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना नियमित कारवाईसह न्याप्रविष्ट प्रकरणांसाठी न्यायालयात वेळ द्यावा लागतो. औषधी विभागाची ४० प्रकरणे ही न्यायालयात प्रलंबित आहेत, तर यंदा तीन प्रकरणे नव्याने दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभारी सहआयुक्त उमेश घरोटे यांनी दिली. अन्न विभागाकडून शेकडो प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत.

जिल्ह्याची लोकसंख्या - २८, ८८, ४४५ (२०११ च्या जनगणनेनुसार)

जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर - २०००

औषध निरीक्षक - १

जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरेंट -१४३१

अन्न निरीक्षक - ४