शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांचा आयुक्तांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST

अमरावती : ७० फूट विहिरीत पडलेल्या साडेचार वर्षाच्या मुलासह त्याला वाचविणाऱ्या पित्याचे रेस्क्यू करणाऱ्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा महापालिका आयुक्त ...

अमरावती : ७० फूट विहिरीत पडलेल्या साडेचार वर्षाच्या मुलासह त्याला वाचविणाऱ्या पित्याचे रेस्क्यू करणाऱ्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सोमवारी सत्कार केला. महापालिकेसाठी ही बाब गौरवास्पद असल्याचे आयुक्त म्हणाले. यावेळी अग्निशमन विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

--------------------------

महापौरांनी केली भीमटेकडीची पाहणी

अमरावती : भीमटेकडी येथे महापालिकाद्वारे ध्यान केंद्र, प्रसाधनगृह, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, पर्यटन निवास, स्वागत कक्ष तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. या कामांची सद्यस्थिती काय आहे, हे पाहण्याकरीता महापौर चेतन गावंडे यांनी सोमवारी पाहणी दौरा केला. यावेळी अजय गोंडाणे, प्रणित सोनी, उपायुक्त सुरेश पाटील सोबत होते.

------------------------------

नागरी अंगणवाडी मदतनिसांना मिळणार न्याय

अमरावती : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत नागरी क्षेत्रातील अंगणवाडी मदतनिसांना न्याय देण्यासाठी पदोन्नतीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अटी व शर्तींची योग्य पडताळणी करून सुधारणा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, असे निर्देश महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी यंत्रणेला दिले.

---------------------

बोर्डी नाला मध्यम प्रकल्पाच्या कामांना गती

अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील बोर्डी नाला मध्यम प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व पर्यावरण मान्यता प्राप्त झाल्या आहेत. बोरगाव मोहणा गावालगत बांधकाम सुरू असलेल्या या प्रकल्पाची घळभरणी ना. बच्चू कडू यांच्या हस्ते झाली. यावेळी सरपंच अमोल ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

----------------------------------------

जिल्ह्यात सद्यस्थितीत ४,३४७ ॲक्टिव्ह रुग्ण

अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत ४,३४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी १,०३६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात १,८३७ व ग्रामीणमध्ये १,४७५ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

------------------

प्रभागांमध्ये पुन्हा कचऱ्याचे ढीग

अमरावती : स्वच्छता कंत्राटदारांद्वारे नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने बहुतेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहेत. महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. नाल्यांचीही नियमित सफाई केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.