शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आग, पाच घरे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:01 IST

बुधवारी मुऱ्हा देवी येथे दुपारी १.३० वाजता मोठी आग लागून अ. सलीम शे. नजीर, शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांची घरे जळून खाक झाली. जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजारेही जळाल्याने ऐन मशागतीच्या दिवसांत त्यांची पंचाईत झाली आहे. या आगीत अ. सलीम शे. नजीर यांचे दोन बैल जागीच होरपळून दगावले, तर एक बैल पूर्णत: भाजला गेला.

ठळक मुद्देमुऱ्हादेवी येथील घटना : गोठ्यात बांधलेली पाच जनावरेही मृत्युमुखी

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील मुऱ्हादेवी येथे बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत पाच घरे जळून खाक झाली. गोठ्यात बांधलेले तीन बैल, एक म्हैस, बोकडाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही भीषण आग आटोक्यात आणण्याकरिता दर्यापूर, आकोट, अचलपूरहून अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.
उन्हाचा पारा वाढताच अंजनगाव तालुक्यात आगीचा प्रकोप वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी निमखेड बाजार येथे भीषण आगीत मोठे नुकसान झाले.
बुधवारी मुऱ्हा देवी येथे दुपारी १.३० वाजता मोठी आग लागून अ. सलीम शे. नजीर, शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांची घरे जळून खाक झाली. जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजारेही जळाल्याने ऐन मशागतीच्या दिवसांत त्यांची पंचाईत झाली आहे. या आगीत अ. सलीम शे. नजीर यांचे दोन बैल जागीच होरपळून दगावले, तर एक बैल पूर्णत: भाजला गेला. एक म्हैस आणि एक बोकडसुद्धा दगावला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. पाच दिवसांपूर्वी सलीम यांनी ७५ हजारांचीबैलजोडी आणि ६० हजारांची म्हैस घरातील सर्व पुंजी खर्चून आणली होती. गोठ्याला आग लागल्यानंतर जनावरांना सोडण्यास गेलेल्या अ. सलीमदेखील भाजले गेले. शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजार जळाल्याने मोठे नुकसान झाले. अतुल पखान यांचे शेतीपयोगी अवजार जळाले. आग आटोक्यात आणण्याकरिता ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा केला. मात्र, आग आटोक्यात येण्याचे नाव घेत नव्हती.

अग्निशमन वाहन नादुरुस्त
अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याने दर्यापूर, अचलपूर, अकोट येथील बंब बोलावण्यात आले. यानंतर आग आटोक्यात आली. वृत्त लिहिस्तोवर महसूल प्रशासन घटनास्थळाचा पंचनामा करीत होते. तहसीलदार विश्वनाथ घुगे, चिंचोली रहिमापूरचे ठाणेदार जमील शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

दर्यापूरला फोन करा
अंजनगाव नगर परिषदेचे अग्निशमन वाहन बुधवारीही कुचकामी ठरले. आमचे वाहन नादुरुस्त आहे. दर्यापूरला फोन करा, असा सल्ला ग्रामस्थांना मिळाला. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असताना तालुक्यात एकही अग्निशमन वाहन नसल्याने आमदारांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी चर्चा आहे.

टॅग्स :fireआग