शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ३०० दिवसात १९,६०० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात पहिल्या कोरोना रुग्णाच्या नोंदीला बुधवारी ३०० दिवस झाले. या कालावधीत १९ हजार ५९६ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात ...

अमरावती : जिल्ह्यात पहिल्या कोरोना रुग्णाच्या नोंदीला बुधवारी ३०० दिवस झाले. या कालावधीत १९ हजार ५९६ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. रोज सरासरी ६५ रुग्ण निष्पन्न झालेले आहेत. याव्यतिरिक्त या कालावधीत कोरोना बळींची संख्या ३९६ वर पोहोचल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. पहिला रुग्ण हा ‘होमडेड’ असल्याने पहिल्या कोरोना बळीची नोंददेखील याच तारखेला झालेली आहे. त्यानंतर सातत्याने संक्रमितांची संख्यावाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट जिल्ह्यात झालेला आहे. या महिन्यात कोरोना डबलिंगचा रेट हा फक्त १५ दिवसावर आलेला होता. नागरिकांची सकारात्मक वृत्ती व आरोग्य यंत्रणेचे कसोशीचे प्रयत्न यामुळे कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात आलेले आहे.

नोव्हेंबरपश्चात म्हणजेच दिवाळी झाल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होईल, असा आरोग्य यंत्रणेचा अंदाज होता व त्यादृष्टीने शासनाचा अलर्टदेखील होता. मात्र, सुदैवाने कोरोना संसर्ग माघारल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.

बॉक्स

कोरोनाची जिल्हास्थिती

जिल्ह्यात बुधवारी ७० अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १९,५९६ वर पोहोचली आहे, सद्यस्थितीत १८३ रुग्णांवर कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याव्यतिरिक्त महापालिका क्षेत्रात ६७ व ग्रामीणमध्ये १२३ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी १३८ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यत १८,२८७ व्यक्ती संक्रमणमुक्त झाल्या आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट उच्चांकी ९६.०८ असल्याने दिलासा मिळाला आहे.