शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष वाचविण्याकरीता महिला एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 13:39 IST

वनकायदानुसार कारवाई करा ही प्रमुख मागणी करीत सकाळी घरातील हातचे कामे सोडुन रणरागिणी महीला नगरपरिषद कार्यालयावर धडकल्या.

आकोट नगर परिषदवर धडकल्या रणरागिणी विजय शिंदेआकोट:आकोट उपविभागिय अधिकारी(महसुल) यांच्या शासकीय निवासस्थानी वृक्षतोड करणारे रानकसाईवर वनकायदानुसार कारवाई करा ही प्रमुख मागणी करीत सकाळी घरातील हातचे कामे सोडुन रणरागिणी महीला नगरपरिषद कार्यालयावर धडकल्या.केवळ वटपोर्णिमाची पुजा करीत वडाला धागे न बांधता हिरवेगार सर्वचवृक्ष वाचविण्याकरीता ह्या महीला एकत्र आल्या. दारूबंदीकरीता लढा उभारण्याकरीता महीला एकवटले आहेत. पंरतु वृक्ष वाचविण्याकरीता महीलां एकवटल्याची बहुद्या ही पहीलीच घटना आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग आकोट यांचे अख्यारीत एसडीओचे निवासस्थान आहे. या परिसरातील 8 हिरवेगार झाडाची अवैधपणे कटाई करण्यात आली. सा.बा. विभागाने तीन वाळलेल्या झाडाचा लिलाव केला. पंरतु प्रत्यक्षात नगरपरिषदची परवानगी नसलेली मोठमोठी हिरवी झाडे कापली आहेत. तसेच नरसिंग रोडवरील नझुलचे जागेमधील हिरवेगार झाड तोडले असतांना आम्ही पोहचल्याने कटाई करणारा पळुन गेला आहे.या अवैधपणे वृक्ष कटाई प्रकरणाची चौकशी करून संबधीतावर वनकायदानुसार कारवाई करण्याची मागणी वृक्ष लागवड समितीचे अध्यक्षा शोभाताई बोडखे, अर्पणा चिखले,चंचल पिताबंवाले, शोभना भांडे, रूचा ठाकुर, कविता राठोर, दिपाली केवटी राधिका देशपांडे ,मिनाक्षी आडे,मजुषा बोडखे यांचेसह महीलांनी केली. यावेळी मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्षा व सचीव गीता ठाकरे यांनी महीलांचे म्हणणे ऐकुन घेत निवेदन स्विकारले. यावेळी महीलांनी आम्ही झाडे लावतो. शासनसुध्दा चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राबवित आहे. पंरतु खुलेआम वृक्षकटाईमुळे शासनाची बदनामी होत हरताळ फासली जात आहे.त्या दोंघीनी वाचवले झाडआकोट एसडीओ बंगलातील अवैध वृक्ष कटाईचे प्रकरण लोकमतने चव्हाट्यावर आणल्यिनंतर समाजात वृक्ष वाचविण्याकरीता जनजागृती व धडपळ सुरू झाली आहे. आज नरसिंग रोडवर नझुल जागेतील एक हिरवे झाड कटाईची माहीती वृक्ष लागवड समितीचे चंचल पिताबंरवाले व अर्पणाताई चिखले यांना मिळताच ह्या दोंघी तिथं धावुन गेल्या. झाड तोडत असतांनाच परवानगी मागताच वृक्षतोडणाराने पोबारा केला. त्यामुळे पुर्ण झाड आज तरी वाचले.कदाचित ह्या दोघी गेल्या नसत्या तर एक झाड कटले असते. महीलामुळे झाड वाचविण्याचा प्रेरणादायी संदेश समाजात गेला. पंरतु विविध कारणे देत वृक्ष तोडणे सुरू आहे. अधिकारी त्वरीत कारवाई करत नसल्याने वृक्ष तोडणाराचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे फोटो सेशनकरीत झाड लावायचे तरी कशाकरीता असा प्रश्न भेडसावत असल्याने वृक्ष वाचविण्याकरीता लागवडी प्रमाणे सर्वानी एकवटने गरजेच झाले आहे.