शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात तापमानात वाढ; पिके कोमेजली

By admin | Updated: August 25, 2015 01:50 IST

पावसाचा पुन्हा खंड, शेतकरी हवालदील.

अकोला : राज्यात दुसर्‍यांदा पावसाचा खंड पडला असून, खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विदर्भात पावसाचा खंड तर पडलाच, शिवाय तापमानातही वाढ झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत. या आठवड्यात पाऊस न आल्यास फळधारणेवर आलेली पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यात ९३ टक्के क्षेत्रावर, म्हणजेच १ कोटी १५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकर्‍यांनी विविध पिकांची पेरणी केली; पण जून महिन्याच्या पावसानंतर दीड महिना दडी मारल्याने पिकांना अगोदरच फटका बसला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस पाऊस आला, त्यानंतर पुन्हा २0 दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने दुष्काळाचे सावट कायम आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नव्हते. त्यानंतर तापमानात वाढ झाली असून, या तापमानाने पुन्हा जमीन भेगाळली आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटलेलीच आहे. विदर्भातील शेतकर्‍यांनी जून महिन्यात कापूस, सोयाबीन, कडधान्य, गळीत, तृणधान्य व धान पिकांची जवळपास ४५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. जून महिन्यात पेरणी केलेल्या काळ्य़ा, भारी जमिनीतील पिकांना ऑगस्ट महिन्यातील पावसाने दिलासा दिला. या पिकांची वाढ जरी कमी असली तरी सध्या सोयाबीनला फुलोरा व शेंगा येत आहेत, तर कापसाला पात्या, फुले धरली आहेत. शेंगा व बोंडे परिपक्व होण्यासाठी याचवेळी पावसाची नितांत गरज आहे; पण गत वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या पिकांनी माना टाकल्या आहेत. २0 जुलै व ऑगस्ट महिन्यात पेरणी केलेल्या पिकांनासुद्धा या पावसाच्या खंडाचा फटका बसत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील स्थिती गंभीर आहे. पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात आतापर्यंंत ५0८. ९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या ४ टक्के कमी असला तरी हा पाऊस केवळ चार दिवस पडला. पावसाचे दिवस २२ असले तरी इतर दिवशी तुरळक स्वरू पाचाच पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्‍यांना चांगल्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.