शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 1:49 PM

नापिकी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला होता, त्यामुळे त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा गावानजीक असलेल्या लोधीपूर या गावातील एका युवा शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या शेतकºयावर कर्जाचा डोंगर असून, नापिकी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला होता, त्यामुळे त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.लोधीपूर येथील रहिवासी निखिल गजानन वानखडे (२६) यांच्याकडे तीन एकर शेती असून, ही शेती पीकविण्यासाठी त्यांनी बँका तसेच खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. पीक हाती आल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याचा त्यांचा मानस होता; मात्र यावर्षी हातातोंडाशी आलेल्या पिकाची पाण्यामुळे नासाडी झाली, त्यामुळे निखिल वानखडे प्रचंड संकटात आले होते. कर्ज फिटणार नाही, तसेच पुढील वर्षीच्या पेरणीच्या संकटामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिल वानखडे यांना तीन वर्षांची मुलगी तर सहा महिन्यांचा मुलगा असल्याची माहिती आहे. निखिल त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे वानखडे यांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर