शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

अकोला जिल्ह्यात लोकसहभागातून ३५०० वनराई बंधारे बांधणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:47 AM

लोकसहभागातून ३ हजार ५०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील नदी-नाल्यांमधून वाहते पाणी थांबवून, पाणी पातळी वाढविण्यासह रब्बी हंगामात शेतीच्या संरक्षित ओलितासाठी पाणी देण्याकरिता जिल्ह्यात लोकसहभागातून ३ हजार ५०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.यावर्षी जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्याने नदी-नाल्यांच्या पात्रातून पाणी वाहत आहे. वाहते पाणी थांबवून पाण्याची पातळी वाढविणे आणि रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या संरक्षित ओलितासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात ५०० प्रमाणे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ३ हजार ५०० वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. महसूल, कृषी, पंचायत व शिक्षण विभागांसह शेतकऱ्यांच्या सहभागातून येत्या २० नोव्हेंबरपासून जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू होणार आहे.नोडल अधिकारी, नियंत्रण अधिकारी नियुक्त!जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर उपजिल्हाधिकारी (रोहयो) राहुल वानखडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) नियंत्रण अधिकारी म्हणून काम करतील. तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी संयुक्त पद्धतीने काम करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित अधिकाºयांना पत्राद्वारे दिले आहेत.

लोकचळवळ करा; जिल्हाधिकाºयांचे निर्देश!जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ५०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्यासाठी तहसीलदारांनी महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, शिक्षण विभाग व स्वयंसेवी संस्थांना वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करून द्यावे. वनराई बंधारे बांधणे ही लोकचळवळ होईल, यासाठी तालुका स्तरावर प्रयत्न करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना १६ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण