शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

अकोला  जिल्ह्यात ७४ हजार शेतकऱ्यांचे ५१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:16 AM

Crop loss due to rain in Akola ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

अकोला : यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला असून, पीक नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

सतत पाऊस आणि नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर गत जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत करण्यात आले असून, जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस व पुराच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान!

प्रशासनाच्या अहवालानुसार पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ३० हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावरील मूग पिकाचे नुकसान झाले असून, त्यापाठोपाठ १३ हजार ८६९ हेक्टर क्षेत्रावरील उडीद, ३ हजार ४३४ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व २ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.

पाऊस आणि पुरामुळे जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा अहवाल ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

- उदयकुमार नलवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी