शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रांची आज सरमिसळ

By admin | Updated: June 21, 2024 17:32 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांची सरमिसळ गुरुवारी करण्यात येणार आहे़

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांची सरमिसळ गुरुवारी करण्यात येणार आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीतील शासकीय गोदामात सकाळी १० वाजता ही कार्यवाही होणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे़विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे़ मतदानासाठी सन २००६ नंतरचे मतदान यंत्र वापरण्यात येणार आहेत़ उत्तर प्रदेशातून ही यंत्र आणण्यात आली आहेत़ उत्तर प्रदेशातून आणलेली ९ हजार ४०० मतदान यंत्र नागापूर येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत़ यंत्रांची तपासणी करण्यात आली असून, मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांची सरमिसळ करण्यात येणार आहे़ राजकीय पक्षांचे प्रतिनिधींच्या उपस्थित ही प्रक्रिया राबविली जाणार असून, सर्व राजकीय पक्षांना तसे कळविण्यात आले आहे़ त्यानंतर ही मतदान यंत्र मतदारसंघातील मतदान केंद्रांवर रवाना केली जाणार आहेत़जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ५९३ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे़ नगर शहर वगळता उर्वरित मतदारसंघात नेहमीचे मतदान यंत्र असणार आहेत़ नगर शहरात व्हीव्हीपीटी यंत्र वापरले जाणार आहे़ त्यामुळे आपण कुणाला मतदान केले, याची माहिती काही सेकंदात मतदारांना मिळणार आहे़ शहरातील २६५ मतदान केंद्रांवर ही यंत्र जोडली जाणार आहेत़ मतदान यंत्रांची सर्व माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली जाणार असून,त्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे़ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)