शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार जणांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST

अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागातले रणांगण तापले असून, मंगळवारी तब्बल ६ हजार ४०० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. ...

अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागातले रणांगण तापले असून, मंगळवारी तब्बल ६ हजार ४०० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. दत्त जयंतीचा मुहुर्त साधून अनेकांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. चार दिवसांमध्ये ८ हजार ४५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी गर्दी होणार आहे.

मंगळवारी दाखल झालेले अर्ज (कंसात आतापर्यंत दाखल झालेेले अर्ज) : अकोले -३१२ (३९४), संगमनेर-२९५ (३७६),कोपरगाव-४०० (४५७), श्रीरामपूर -३२५ (४२८), राहाता-२५८ (३१३), राहुरी -३२८ (३९९), नेवासा-५३४ (७३८), नगर-६३९ (७८१),पारनेर-७३९ (५५७), पाथर्डी -६२५ (७६२), शेवगाव -४५५ (६१३), कर्जत-४८९ (६२०),जामखेड-४४२ (५७८), श्रीगोंदा -५९२ (७३०). एकूण-६४३३ (८०४६). गेल्या चार दिवसांमध्ये सर्वाधिक अर्ज मंगळवारी दाखल झाले.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीमध्ये ७ हजार १३४ सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत ८ हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी बुधवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच तहसील कार्यालयात झुंबड उडण्याची शक्यता आहे.