शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

"माझं ग्रहमान ठीक नाही"; सुजय विखेंच्या विधानावर जयश्री थोरात म्हणाल्या, "तुमची रेसिपी चुकली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 20:55 IST

माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय अशी भावना सुजय विखेंनी व्यक्त केली होती.

Jashree Thorat on Sujay Vikhe Patil : गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाद आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र या प्रचारादरम्यान, सुजय विखे पाटील यांच्या एका मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याने मोठा वाद उफळला होता. त्याबद्दल बोलताना सुजय विखे यांनी माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय अशी भावना व्यक्त केली होती. त्यावर आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी भाष्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सुजय विखे पाटील हे संगमनेर मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सुजय विखे यांच्या सभेदरम्यान भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याप्रकरणी देशमुख यांना अटक देखील झाली. त्यानंतर सुजय विखे यांनी एका सभेत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

माझं काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय, असं सुजय विखेंनी म्हटलं होतं. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुजय विखे यांच्या या वक्तव्यावर जयश्री थोरात यांनी भाष्य केलं आहे. "संगमनेर तालुक्यात सुजय विखेंनी चार सभा घेतल्या. चार सभांमध्ये त्यांना वाटत असेल की त्यांचं पातेलं शिजलं तर तो त्यांच्या गैरसमज म्हटला पाहिजे. चार सभांमध्ये पातेलं शिजलं असं म्हणता येत नाही. तो त्यांचा गैरसमज आहे. त्यांनी संगमनेर मध्ये घेतलेल्या सभा या वेगळ्या होत्या. आमच्या संगमनेर तालुक्याला अशा राट भाषेची सवय नाही. त्यांची रेसिपी ठिकाण आणि त्यांची वेळ पण चुकली. पातेल्यातलं शिजलं जरी असेल तरी त्याची चव चांगली नसेल," असं जयश्री थोरात यांनी म्हटलं.

काय म्हणाले सुजय विखे पाटील?

"लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगलं वातावरण असताना नंतर अचानक काय झालं माहिती नाही. माझा पराभव झाला. माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटलं की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली. मात्र वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली. त्यामुळे माझं काय ग्रहमान लोकांसाठी ठीक दिसत नाही. मला बोलवू नका. तुमचं चाललंय चालूद्या. मी योग्य त्या गोष्टी वेळेवर करेन," असे सुजय विखेंनी म्हटलं होतं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsangamner-acसंगमनेरSujay Vikheसुजय विखे