शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक वीज असताना भारनियमनाचे चटके!

By admin | Updated: September 30, 2014 01:29 IST

चंद्रकांत शेळके , अहमदनगर गेल्या तीन महिन्यांपासून भारनियमनाचा विसर पडलेल्या ग्राहकांना सणासुदीच्या तोंडावर ‘एमर्जन्सी लोडशेडिंग’चे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे.

चंद्रकांत शेळके , अहमदनगरगेल्या तीन महिन्यांपासून भारनियमनाचा विसर पडलेल्या ग्राहकांना सणासुदीच्या तोंडावर ‘एमर्जन्सी लोडशेडिंग’चे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. उच्च वाहिन्यांतील तांत्रिक बिघाडाचे कारण यासाठी दिले जात आहे. राज्यातील समाधानकारक पावसामुळे धरणांची स्थिती उत्तम असून, वीजनिर्मिती केंद्रही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत. पावसाळ््यात बहुतांश कृषिपंप बंदच होते. परिणामी विजेची मागणी घटली. त्यामुळे राज्यात मागणीच्या प्रमाणात वीज उपलब्ध आहे. सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना भारनियमनातून दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारनेही खबरदारी म्हणून विजेचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेतली. सध्या राज्यात १२ ते १३ हजार मेगावॅट विजेची मागणी असून तेवढी वीज उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु शनिवारपासून औरंगाबाद ते पॉवरग्रीड ४०० केव्हीए, वर्धा ते औरंगाबाद ७६५ केव्हीए व औरंगाबाद ते तळेगाव ४०० केव्हीए या विद्युत वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठ्यात विस्कळीतपणा आला. परिणामी राज्यात तांत्रिक बिघाडाचे कारण देत महावितरणने चार तास भारनियमन सुरू केले. नवरात्रोत्सव काळात भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने अधिकृतपणे जाहीर केले होते, त्यास ४८ तास उलटत नाहीत, तोच पुन्हा वीज पुरवठा विस्कळीत झाला. बिघाड किरकोळ असल्याने सायंकाळपर्यंत दुरूस्ती होऊन पुरवठा सुरळीत होण्याचे संकेतही महावितरणकडून दिले. शनिवार, रविवार व सोमवार सायंकाळपर्यंतही भारनियमन सुरूच असल्याने ग्राहकांचा संताप अनावर झाला. राष्ट्रपती राजवट लागल्याने सर्व सूत्रे प्रशासनाकडे गेली. एका अर्थाने राज्याला हक्काचा पालक राहिला नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरच नेमके भारनियमन कसे सुरू झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.