शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जीएम औषधे चालतात, मग बियाणे का नको?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:22 IST

श्रीगोंदा : काही विकासविरोधी संघटनांच्या दबावामुळे केंद्र शासनाने जीएम वांग्याच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. हे तंत्रज्ञान इतके घातक असेल, ...

श्रीगोंदा : काही विकासविरोधी संघटनांच्या दबावामुळे केंद्र शासनाने जीएम वांग्याच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. हे तंत्रज्ञान इतके घातक असेल, तर औषध उद्योगात या तंत्रज्ञानाच्य‍ा वापरा‍वर बंदी का नाही? असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे.

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशात सुरू असलेल्य‍ा बीटी वांग्याच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे. काही पर्यावरणवादी, विकासविरोधी संघटनांचा आग्रह व पाच राज्यांनी चाचण्य‍ा घेण्याबाबत दाखविलेल्या प्रतिकूलतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक राज्य सरकारांना निवेदने ‍पाठवून बीटी वांग्याच्या चाचण्यांना नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये, असा आग्रह धरला होता.

बीटी वांगे खाण्यास निर्धोक आहेत. प्राणी, पर्यावरण व जमिनीवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, असा निर्वाळा दिला आहे. आयसीएआर या संस्थेनेही जीएम पिकामुळे कोणताही धोका नाही? असे स्पष्ट केलेले असत‍ाना पर्यावरणमंत्र्यांनी असा निर्णय घेणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे.

शेतीसाठी जनुक तंत्रज्ञान (जी.एम.) वापरण्यास विरोध करणारे औषधी क्षेत्रात होणाऱ्या वापराबद्दल काही तक्रार करत नाहीत, असा सवाल घनवट यांनी निवेदनात केला आहे.