शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात कोरोनाचा मृत्यूदर दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:20 IST

मंगळवारी येथील प्रशासकीय इमारतीत आयोजित कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जि.प.चे सीईओ राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. ...

मंगळवारी येथील प्रशासकीय इमारतीत आयोजित कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जि.प.चे सीईओ राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पालिकेचे सीईओ गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप, निरीक्षक मधुकर साळवे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे, ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. योगेश बंड, आगारप्रमुख राकेश शिवदे, डॉ. सचिन पऱ्हे आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी तहसीलदार पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती दिली.

डॉ.भोसले म्हणाले, काळजी घेतली नाही तर परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी. थेट संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना चाचण्या कराव्या. संशयित जर प्रतिसाद देत नसतील त्यांना उचलून आणून चाचण्या घ्याव्यात.

आरोग्य विभाग, महसूल, पोलीस,नगरपालिका, पंचायत समिती आदी विभागांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली.

सीईओ क्षीरसागर यांनी लग्नासाठी ५० लोकांची अट असल्याने लोक आता कार्यालयाऐवजी वाड्या, वस्त्यांवर हजारोंच्या संख्येत लग्न करीत असल्याचे सांगितले. गावोगाव समित्या कार्यरत करून अशा कार्यक्रमांवर पोलीस व स्थानिक सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी समक्ष जाऊन गुन्हे दाखल करावेत, असे आदेश त्यांनी दिले.

-----------

श्रीरामपूर तालुका नापास

प्रशासकीय यंत्रणेमध्ये योग्य समन्वय नसल्याने कोरोना प्रतिबंधक कार्यवाहीत तालुका नापास झाल्याचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला. कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

----------

रस्त्यावर उतरून कारवाई

प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रस्त्यावर उतरून कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी भोसले यांनी दिले.

------