शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भंडारद-यात पाच महिन्यात ४४ हजार पर्यटकांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:18 IST

पर्यटनाची पंढरी समजल्या जाणा-या अकोले तालुक्याच्या भंडारदरा परिसरात यावर्षी एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला.

जागतिक पर्यटन दिन विशेष/ प्रकाश महाले/ वसंत सोनवणे/  राजूर/भंडारदरा : पर्यटनाची पंढरी समजल्या जाणा-या अकोले तालुक्याच्या भंडारदरा परिसरात यावर्षी एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला.
अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पर्यटनाची अनेक स्थळे आहेत. येथील इतिहासाची साक्ष देणारे  गड, किल्ले गिर्यारोहकांना आकर्षित करतात, तर पांडवकालीन हेमाडपंथी मंदिरे येथील पौराणिक आणि धार्मिकतेचे महत्त्व प्राप्त करून देत आहेत. भंडारदरा परिसरात पावसाळ्याच्या सुरूवातीस  काजवा उत्सव सुरू होतो. मुतखेल नाका ते शेंडी नाका असा पन्नास किलोमीटरच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असणा-या गर्द झाडांवर सुरू असणारा काजव्यांचा झगमगाट पर्यटकांना भुरळ घालतो. काजव्यांची सुरुवात होताच येथे पर्यटकांची गर्दी सुरू होत असते, ती फुलोस्तवापर्यंत सुरूच राहते.
यावर्षी परिसरात वरुण राजाचे उशिरा आगमन झाले. मात्र तो पडता झाल्यापासून अद्यापपर्यंत उघडण्याचे नावच घेत नाही. त्यामुळेच जूनच्या अखेरीस सुरू झालेला येथील जलोत्सव अद्यापही त्याच जोमाने सुरू आहे. दर  शनिवारी आणि रविवारी येथे पर्यटकांचा ओढा सुरूच आहे. या वर्षी १ एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत ४३ हजार ८४३ पर्यटकांनी  पर्यटनाचा आनंद लुटला. वन्यजीव विभागामार्फत अनेक ठिकाणी प्यागोडे, काही ठिकाणी पायवाट, निरीक्षणासाठी मनोरे, धोकादायक ठिकाणी लोखंडी रेलिंग उभारण्यात आल्या आहेत. मात्र निधीअभावी दुरूस्तीचे काम रखडले आहे.  शेंडी नाका ते घाटघरपर्यंत मुरशेतचा काही भाग वगळता रस्त्याचे काम झालेले असले तरी मुतखेल ते साम्रद दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 
पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तुटलेल्या रेलिंग, पायवाटा, पुलांची, शिड्यांची दुरुस्ती, न्हानी फॉलजवळ जाण्यासाठी पायवाट आदी बाबींचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यावर्षी गेल्या पाच महिन्यांत ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनस्थळी भेट दिली. पर्यटकांना सुरक्षित व मनमुरादपणे आनंद घेता यावा यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नशील आहे. निधी उपलब्ध होताच दुरुस्तीचे व नव्याने सुचविलेले कामे सुरू होतील, असे कळसूबाई भंडारदरा अभयारण्य विभागाचे वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळे यांनी सांगितले.
 

टॅग्स :environmentपर्यावरणAhmednagarअहमदनगर