शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये ४९ ग्रामपंचायतसाठी ५८१ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST

जामखेड : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा विक्रम नोंदविला गेला. मंगळवारी एकाच दिवसात विक्रमी ४४३ अर्ज ...

जामखेड : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा विक्रम नोंदविला गेला. मंगळवारी एकाच दिवसात विक्रमी ४४३ अर्ज दाखल झाले. तर मंगळवारअखेर एकूण अर्जसंख्या ५८१ वर पोहोचली. उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, उमेदवारी अर्ज सायंकाळी साडेपाच वाजतापर्यंत ऑनलाइन व ऑफलाइन स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, सोमवारी १२८ तर मंगळवार रोजी ४४३ विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त ५६ अर्ज खर्डा ग्रामपंचायतसाठी दाखल झाले आहेत, तर त्या खालोखाल अरणगावसाठी २२ अर्ज दाखल झाले आहेत. दत्त जयंती मुहूर्तावर मंगळवारी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. ऑनलाइन अर्ज असल्याने इच्छुक रात्र जागून काढून उमेदवारी अर्ज भरत आहेत. मंगळवार रोजी गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे- अरणगाव २२, मोहा १४, साकत २१, जवळके १५, सोनेगाव ७, घोडेगाव १६, बोर्ले ११, चोंडी १७, धानोरा १७, मोहरी ४, सावरगाव ८, पिंपळगाव आळवा ८, खांडवी १६, बावी २, कवडगाव ८, डोणगाव १२, नाहुली ९, पिंपळगाव उंडा १४, गुरेवाडी ४, पिंपरखेड ३, धामणगाव ६, दिघोळ ११, बाळगव्हाण ५, आनंदवाडी ५, धोंडपारगाव ६, लोणी ८, कुसडगाव १५, तरडगाव १०, सातेफळ ५, पाटोदा २५, बांधखडक १५, नायगाव ३, तेलंगसी ६, नान्नज १३, खर्डा ५६, पाडळी १०, खुरदैठण ३, चोभेवाडी ४, पोतेवाडी ७ असे एकूण ४४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

..............

अर्ज भरण्याची वेळ ५ पर्यंत वाढवली

ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची किचकट प्रक्रिया व सर्व्हर डाऊनमुळे अर्ज दाखल करण्यास वेळ लागत आहे. राज्य निवडणूक आयोगाने सदर परिस्थिती पाहून बुधवारी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ वाढवली असून, ती तीनऐवजी सायंकाळी साडेपाचपर्यंत केली आहे. उमेदवारी अर्ज व जातपडताळणी अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन स्वीकारले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.