शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वीजनिर्मितीतून २१ कोटींची कमाई

By admin | Updated: April 10, 2024 16:20 IST

श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या १८७ दिवस चाललेल्या गळीत हंगामाची शनिवारी सांगता झाली.

श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या १८७ दिवस चाललेल्या गळीत हंगामाची शनिवारी सांगता झाली. या हंगामात प्रथमच सुरू केलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून कारखान्यास वीज विक्रीतून २१ कोटी १६ लाख रूपयांची भरघोस कमाई झाली. कारखान्याच्या प्रथेनुसार माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात यांच्या हस्ते विधीवत सांगता पूजा करण्यात आली. अध्यक्ष सुरेश गलांडे, उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, राष्टÑवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब काळे, संचालक, अधिकार्‍यांच्या हस्ते गव्हाणीत शेवटची मोळी टाकून हंगामाची सांगता झाली. यंदाच्या हंगामात सुरुवातीस पावसाचा व्यत्यय, तर मार्च महिन्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे अडचणी आल्या. त्यावर मात करण्यासाठी ६ ऊस तोडणी यंत्रांची उपलब्धता करण्यात आली. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या ऊस तोडणीस प्राधान्य दिल्याने नियमित ऊस तोडीचा कार्यक्रम काहीसा लांबला. याच हंगामात सुरू झालेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पाने पहिल्याच वर्षी वीज निर्मितीत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे स्थान पटकाविले. या प्रकल्पातून कारखान्याचा वीज वापरता वगळता ३ कोटी ६४ लाख ३३ हजार युनिटस्ची महावितरणला प्रतियुनिट ५ रूपये ८१ पैसे दराने विक्री करण्यात आली. त्यातून कारखान्यास २१ कोटी १६ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. गळीत हंगामाची साखर उत्पादन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वीज प्रकल्प कार्यान्वित राहील. आॅईल कंपन्यांची मागणी पूर्ण झाल्याने इथेनॉल निर्मिती थांबविण्यात आली. तर हंगाम संपल्यानंतरही काही दिवस आसवनी प्रकल्प सुरू राहणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे व कार्यकारी संचालक भास्कर खंडागळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पन्नास हजार मेट्रीक टन उसाचे गाळप कारखान्याने ५ लाख ५० हजार ७८८ मेट्रिक टन उसाचे गाळप करुन ५ लाख ९० हजार साखर पोत्यांची निर्मिती झाली. या हंगामात २२ जानेवारी २०१४ रोजी एकाच दिवशी ३७१० मेट्रिक टन गळीत झाल्याने एका दिवसात सर्वाधिक गाळपाचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला. आसवनी प्रकल्पाद्वारे ४४ लाख ४२ हजार लिटर्स मद्यार्क निर्मिती व आॅईल कंपनीच्या मागणीनुसार १५ लाख लिटर्स इथेनॉल निर्मिती व पहिल्याच वर्षी कार्यान्वित झालेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे ५ कोटी २८ लाख ६८ हजार युनिटस् वीज निर्मिती झाली. त्यातून ३ कोटी ६४ लाख ३३ हजार युनिटस्ची महावितरणला विक्री केली.