शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

घाटंजी तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:00 AM

शेतकरी राबराब राबून आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न काढतो. त्यासाठी सावकाराकडून व इतर ठिकाणाहून कर्ज घेतो. मात्र उत्पन्न निघण्यापूर्वीच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातही कसेबसे उत्पन्न निघताना आता वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : वन विभागाने बंदोबस्त करावा, पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कपाशी, तूर, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.शेतकरी पिकांची राखण करून आता उत्पन्न घेण्याच्या मार्गावर आहे. मात्र वन्यप्राण्यांमुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. कापूस, तूर, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानडुक्कर व रोहींमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या वन्यप्राण्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.शेतकरी राबराब राबून आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न काढतो. त्यासाठी सावकाराकडून व इतर ठिकाणाहून कर्ज घेतो. मात्र उत्पन्न निघण्यापूर्वीच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातही कसेबसे उत्पन्न निघताना आता वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आमडी येथील संजय मानकर यांच्या शेतात तर रानडुकरे व इतर वन्यप्राण्यांनी कपाशीचे प्रचंड नुकसान केले. त्यांनी वन व कृषी विभागाकडे दाद मागितली असता, अल्पशी मदत मिळाली. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.मदतीस विलंबपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वन विभाग, तहसील व कृषी विभागामार्फत एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे. ही समिती नुकसानीची पाहणी करते. नंतर अहवाल सादर केला जातो. मात्र या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. पिकांची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, यासाठी समितीच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव