शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पाण्यासाठी उपविभागातील ग्रामीण नागरिकांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:34 PM

वणी उपविभागातील वणीसह मारेगाव व पांढरकवडा उपविभागातील झरी या तीन तालुक्यातील ग्रामीण नागरिकांची पाण्यासाठी अक्षरश: होरपळ सुरू आहे. दरवर्षी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याने या नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही.

ठळक मुद्देउपाययोजना कागदोपत्री : शेतातून ड्रमद्वारे आणावे लागते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी उपविभागातील वणीसह मारेगाव व पांढरकवडा उपविभागातील झरी या तीन तालुक्यातील ग्रामीण नागरिकांची पाण्यासाठी अक्षरश: होरपळ सुरू आहे. दरवर्षी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याने या नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. झरी या आदिवासीबहुल तालुक्यातील नागरिकांची अवस्था अतिशय बिकट आहे.ज्या गावातील पाण्याचे स्त्रोत आटले, त्या गावातील नागरिकांना बैलबंडीवर ड्रम ठेऊन त्याद्वारे दूरवरच्या शेतातील विहीर अथवा अन्य स्त्रोतातून पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. म् मागील वर्षी वणी तालुक्यातील कुर्ली, पिपरी कायर या दोन गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. यंदा मार्च महिन्यानंतर वणी तालुक्यातील वडगाव (टिप), कुर्ली, पिंपरी (कायर), वरझडी (बंडा), गोपालपूर, खांदला, गोपालपूर (वरझडी) या सहा गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. या टंचाईवर मात करण्यासाठी बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आल्या. मात्र त्या तोकड्या ठरत आहे.ग्रामपंचायतींची उदासीनताझरी आणि मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायतींनी टंचाईसंदर्भात पंचायत समितीकडे प्रस्तावच पाठविला नसल्याचे वास्तव आहे. मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) येथील नागरिकांनी गावातील पाणी टंचाईच्या मुद्यावरूनच मतदानावर बहिष्कार टाकला होता, हे विशेष. झरी तालुक्यात अद्याप एकाही गावातून पाणीटंचाई संदर्भात प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आला नाही. तालुक्यातील शिबला, निमणी व इतर पठार भागातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. झमकोल, निमणी, वल्लासा, राजनी शिबला, रामपूर, हिरापूर (जुने) अशा काही गावांत पाणी टंचाईचे सावट आहे. अनेक गावांत नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास मोठी समस्या निर्माण होते.नियम डावलून बोअरवेलचे खोदकामगेल्या काही वर्षांत पर्जन्यमान अल्प राहत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिणामी २०० किंवा त्यापेक्षा अधिक फुटावरच पाणी लागत आहे. मात्र नियमानुसार २०० फुटापेक्षा अधिक खोलीची बोअरवेल खोदता येत नाही. मात्र पाणी टंचाईमुळे अनेकजण २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेलचे खोदकाम करीत आहेत. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई