शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कृत्रिम टंचाईवर १७ भरारी पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

यवतमाळातील सोयाबीनच्या प्रमुख वितरकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, कृत्रिम टंचाईच्या नावाने जादा दरात बियाणे विकले जात आहे. सौदे व बुकिंग करून कंपनीतूनच परस्पर मालाची दुसऱ्या जिल्ह्यात विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील रिटेलरला मागणीच्या अर्धाच बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. कंपनीकडून मालच आला नाही, कंपनी यावेळी पैशासाठी साईट देत नाही अशी कारणे सांगून टंचाई निर्माण केली जात आहे.

ठळक मुद्देकलेक्टरची बैठक : बोगस बियाणे, जादा दराने विक्रीवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोयाबीनसह अन्य बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने होणारी विक्री रोखणे, बोगस बियाणे थांबविणे आदी कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाची १७ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सोमवारी येथे बैठकीत दिले.यवतमाळातील सोयाबीनच्या प्रमुख वितरकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, कृत्रिम टंचाईच्या नावाने जादा दरात बियाणे विकले जात आहे. सौदे व बुकिंग करून कंपनीतूनच परस्पर मालाची दुसऱ्या जिल्ह्यात विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील रिटेलरला मागणीच्या अर्धाच बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. कंपनीकडून मालच आला नाही, कंपनी यावेळी पैशासाठी साईट देत नाही अशी कारणे सांगून टंचाई निर्माण केली जात आहे. प्रमुख वितरकांची गोदामे बियाण्यांनी भरली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या सर्व मुद्यांवर ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाशझोत टाकून वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना लुटणाऱ्यां यवतमाळातील व ग्रामीणमधील प्रमुख वितरकांचा पर्दाफाश केला. ही वृत्तमालिका कृषी आयुक्तांपर्यंत पोहोचल्याने पुण्यातूनही येथील कृषी अधिकाºयांची झाडाझडती घेतली गेली.या वृत्ताची दखल घेत अखेर सोमवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सर्व सोळाही तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. त्यात खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध मुद्यावर चर्चा केली गेली. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर वॉच ठेऊन त्यांच्याविरोधात कडक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. एमआरपी पेक्षा जादा दराने विकणाऱ्यांनाही दणका देण्याची सूचना केली गेली. सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बियाणे व खतांच्या मागणी व पुरवठ्यात तफावत येणार नाही या दृष्टीने निरीक्षण व नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले गेले. वणीपासून उमरखेडपर्यंत बियाणे व खतातील गोंधळ थांबविण्यासाठी १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली.फवारणी विषबाधेबाबतही सावधगिरीतीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन अनेक शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर कीटकनाशक फवारणीच्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्याचे निर्देश देण्यात आले. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कुण्या शेतकºयाला विषबाधा झाल्यास लगेच तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकाºयांना याबाबत माहिती देण्याच्या सूचनाही बैठकीत दिल्या गेल्या. या बैठकीमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. कृषी अधिकाºयांनी बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईचे मूळ शोधण्याची व कंपन्यांसह विविध ठिकाणावरून माहिती मागविण्याची व्युहरचनाही केल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :agricultureशेती