शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ओला शेतमाल ठेवण्यास वखार महामंडळाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 11:06 IST

परतीच्या पावसाने शेतमालाची प्रत घसरली आहे. या धान्याला खुल्या बाजारात कमी दर मिळत आहे. असे धान्य सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी वखार महामंडळाकडे धाव घेतली. गुणवत्ता घसरलेला शेतमाल स्वीकारण्यास वखार महामंडळांनी नकार दिला आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने प्रत घसरली छोटे कर्ज मंजूर करताना बँकांनी झटकले हात

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने शेतमालाची प्रत घसरली आहे. या धान्याला खुल्या बाजारात कमी दर मिळत आहे. असे धान्य सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी वखार महामंडळाकडे धाव घेतली. गुणवत्ता घसरलेला शेतमाल स्वीकारण्यास वखार महामंडळांनी नकार दिला आहे. तर खासगी गोदामातील धान्यावर कर्ज देताना बँकांनी हात झटकले आहेत.खुल्या बाजारात शेतमालाचे दर पडल्यास शेतमालास संरक्षण देणारी यंत्रणा उभी करण्यात आली. त्याकरिता राज्य वखार महांमडळ आणि केंद्रीय वखार महामंडळाची निर्मिती करण्यात आली. वखार महामंडळात शासकीय धान्यासोबत शेतमाल ठेवण्याची तरतूद आहे. वखार महामंडळाच्या क्षमतेनुसार हे धान्य ठेवले जाते. या ठिकाणी ठेवलेल्या धान्यावर तारण दिले जाते. त्याचे व्याजदर अत्यल्प असतात.तारण म्हणून ठेवलेल्या धान्याला बँका खुल्या बाजारातील दराच्या ७० टक्के कर्ज देते. यामुळे दर पडलेल्या अवस्थेत शेतकरी वखार महामंडळाच्या गोदामाकडे धाव घेतात. यावर्षी सोयाबीनचे दर घसरले आहेत. गुणवत्ता घसरलेल्या धान्याला संरक्षण मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी असे धान्य वेअर हाऊसकडे हलविले. मात्र वखार महामंडळांनी धान्य नियमात बसत नाही म्हणून नाकारले आहे. परतीच्या पावसाने भिजलेले धान्य खराब होणार या भीतीने वखार महामंडळ असे धान्य ठेवण्यासाठी तयार नाही. बँकाही अशा धान्यावर कर्ज देण्यास तयार नाही. यातून शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.व्यापाऱ्यांची संख्या घटलीखरेदी झालेले धान्य ठेवायचे, त्यावर कर्ज घ्यायचे आणि नव्याने व्यापार करायचा, असा वखार महामंडळाचा व्यवहार चालत होता. आता गोदामात धान्यच स्वीकारले गेले नाही. यामुळे पैशाची गुंतवणूक थांबली आहे. बाजारात धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या घटली आहे.नियमानुसार, १२ ते १४ टक्के ओलावा असणारा शेतमालच गोदामात ठेवता येतो. यापेक्षा जास्त ओलावा असणारा शेतमाल घेतला जात नाही. तो वाळवून आणल्यानंतरच ठेवण्यास परवानगी दिली जाते. अन्यथा बुरशीने शेतकºयांच्या मालासह इतरही शेतमाल खराब होतो. चांगल्या मालास कुठलीही हरकत नाही.- भास्कर भगत, प्रभारी व्यवस्थापक, केंद्रीय वखार महामंडळ, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती