शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

अप्रमाणित बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत

By admin | Updated: October 5, 2014 23:14 IST

खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या विश्वासाने खरेदी केलेल्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे आता उघडकीस येत आहे. अनेक कृषी केंद्रातून अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे पुढे आले आहे.

महागाव : खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या विश्वासाने खरेदी केलेल्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे आता उघडकीस येत आहे. अनेक कृषी केंद्रातून अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे पुढे आले आहे. कृषी विभागाने या प्रकरणी कृषी केंद्र चालकांना नोटीस बजावली. मात्र त्यांनी केराची टोपली दाखविली. तसेच कृषी विभागाच्यावतीने आयोजित ग्रामसभा, मेळावेही कागदोपत्रीच दिसत आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. पावसाच्या प्रतीक्षेत बी-बियाण्यांची खरेदी लांबली. पाऊस आला तेव्हा बियाण्यांच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. यात महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसगत झाल्याचे पुढे येत आहे. अनेकांनी पेरलेले सोयाबीन उगविलेच नाही. तर काही ठिकाणी शेंगाच लागल्या नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. परंतु त्यांनीही केवळ बोळवणच केली आहे. कृषी केंद्रांवर पंचायत समितीचा कृषी विभाग मेहरनजर असल्याचे दिसत आहे. अप्रमाणित बियाण्यातून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असताना कृषी केंद्र चालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. कृषी केंद्राच्या तपासण्याच होत नसल्याने अप्रमाणित बियाणे विक्रीला उधाण आले होते. कृषी केंद्र संचालकांनी सारे नियम पायदळी तुडविले. कृषी केंद्रात दर्शनी भागावर भाव फलक, उपलब्ध खत, औषधी साठा, मुदत संपलेली औषधी, बियाणे प्रमाणित असल्याबाबत पुरावे आदी अपवादानेच पहायला मिळतात. पाच कृषी केंद्रातून विकलेले बियाणे अप्रमाणित निघाले. या पाचही कृषी केंद्र संचालकांना कृषी विभागाने १७ सप्टेंबर रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली. परंतु पंधरवाडा उलटला तरी या नोटीसला उत्तर दिले नाही. महागाव तालुक्यात सातत्याने बनावट बियाणे विकले जात असून त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तालुक्यात ७२ कृषी केंद्र कार्यरत असून महागाव आणि मुडाणा येथील घाऊक दुकानातून तालुक्यातील इतर कृषी केंद्रांना मालाचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांची फसवणूक होऊनही कृषी केंद्रांवर ठोस कारवाई केली जात नाही. तालुक्यातील २० हजार हेक्टरवरील सोयाबीन विविध रोगाला बळी पडले आहे. काही ठिकाणी बनावट बियाणे निघाले आहे. मात्र कृषी अधिकारी कार्यालय आणि शेतकरी यांच्यात समन्वय दिसत नाही. कृषी विभागाने शेतकरी मार्गदर्शन मेळावे घेतल्याचा गाजावाजा केला. परंतु प्रत्यक्षात सरपंचानाही या मेळाव्याची माहिती दिसत नाही. एकंदरित कृषी विभागाच्या या धोरणाचे शेतकरी मात्र बळी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)