शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

ट्रॅव्हल्स भस्मसात; मृत्यूच्या दाढेतून परतले 20 प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 22:58 IST

चिंतामणी ट्रॅव्हल्सची यवतमाळ-मुंबई ही एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० या क्रमांकाची बस शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता यवतमाळहून मुंबईसाठी निघाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये ५३ व्यक्ती होत्या. त्यापैकी १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, यातील काहींची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. यवतमाळ येथील लखन राठोड आणि मीराबाई राठोड या जखमींवर नाशिकच्या सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळहून मुंबईसाठी निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला शनिवारी पहाटे नाशिक येथील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील अजय मोहन कुचनकर या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर २० जण बालंबाल बचावले आहेत. जखमीवर नाशिकमधील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर किरकोळ जखमी असलेल्या चौघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची यवतमाळ-मुंबई ही एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० या क्रमांकाची बस शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता यवतमाळहून मुंबईसाठी निघाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये ५३ व्यक्ती होत्या. त्यापैकी १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, यातील काहींची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. यवतमाळ येथील लखन राठोड आणि मीराबाई राठोड या जखमींवर नाशिकच्या सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे, तर नाशिक जिल्हा रुग्णालयात अमितकुमार (यवतमाळ), सचिन जाधव, अश्विनी जाधव (पुसद), अजय शेषराव देवगन (दिग्रस), ज्ञानदेव नथू राठोड (पुसद), दीपक बजरंग शेंडे (ड्रायव्हर, यवतमाळ), सतीश बाबूसिंग राठोड, स्वरा ज्ञानदेव राठोड (यवतमाळ), अनिल चव्हाण (पुसद), हंसराज (दिग्रस), महादेव धोत्रे, पिराजी धोत्रे (आर्णी) यांचा समावेश असून, पुसद येथील प्रभादेवी केशव जाधव यांना एनडीव्हीपी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यवतमाळातीलच वैशाली बागडे आणि उज्ज्वल यांच्यासह दिग्रस येथील बादल बस्सी आणि पायल साबळे हे चौघेजण या अपघातात किरकोळ जखमी झाले होते. उपचारानंतर ते पुढे मुंबईला पोहोचले असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान या अपघातामुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासगी प्रवासी वाहनांची आरटीओतर्फे नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

ओळख पटविण्यासाठी संपर्क कराजिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र त्याचे अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. याबरोबरच सदर ट्रॅव्हल्सने आणखी काही प्रवासी ज्यांची ट्रॅव्हल्स कंपनीकडे नोंद नाही, असे या अपघातात जखमी अथवा मृत झाले असतील तर संबंधितांच्या नातेवाइकांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी ८६६८७८४८४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

आरटीओच्या नाकर्तेपणामुळेच अपघात वाढलेआरटीओ कार्यालयातील काहींनी थेट ट्रॅव्हल्सच्या धंद्यात भागिदारी केली आहे. यासाठी स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून अतिरिक्त होणारी प्रवासी वाहतूक याकडे दुर्लक्ष केले जाते. ट्रॅव्हल्स चालकांकडून वसुलीसाठी प्रतिनियुक्तीवर विशेष अधिकारी आणला आहे. ओव्हरलोडचाही हिशेब त्याच अधिकाऱ्याकडे आहे. आर्थिक हितसंबंधातून होत असलेल्या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष झाल्यानेच अपघात वाढले आहे. यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :fireआग