शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

ट्रॅव्हल्स भस्मसात; मृत्यूच्या दाढेतून परतले 20 प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 22:58 IST

चिंतामणी ट्रॅव्हल्सची यवतमाळ-मुंबई ही एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० या क्रमांकाची बस शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता यवतमाळहून मुंबईसाठी निघाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये ५३ व्यक्ती होत्या. त्यापैकी १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, यातील काहींची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. यवतमाळ येथील लखन राठोड आणि मीराबाई राठोड या जखमींवर नाशिकच्या सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळहून मुंबईसाठी निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला शनिवारी पहाटे नाशिक येथील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील अजय मोहन कुचनकर या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर २० जण बालंबाल बचावले आहेत. जखमीवर नाशिकमधील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर किरकोळ जखमी असलेल्या चौघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची यवतमाळ-मुंबई ही एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० या क्रमांकाची बस शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता यवतमाळहून मुंबईसाठी निघाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये ५३ व्यक्ती होत्या. त्यापैकी १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, यातील काहींची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. यवतमाळ येथील लखन राठोड आणि मीराबाई राठोड या जखमींवर नाशिकच्या सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे, तर नाशिक जिल्हा रुग्णालयात अमितकुमार (यवतमाळ), सचिन जाधव, अश्विनी जाधव (पुसद), अजय शेषराव देवगन (दिग्रस), ज्ञानदेव नथू राठोड (पुसद), दीपक बजरंग शेंडे (ड्रायव्हर, यवतमाळ), सतीश बाबूसिंग राठोड, स्वरा ज्ञानदेव राठोड (यवतमाळ), अनिल चव्हाण (पुसद), हंसराज (दिग्रस), महादेव धोत्रे, पिराजी धोत्रे (आर्णी) यांचा समावेश असून, पुसद येथील प्रभादेवी केशव जाधव यांना एनडीव्हीपी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यवतमाळातीलच वैशाली बागडे आणि उज्ज्वल यांच्यासह दिग्रस येथील बादल बस्सी आणि पायल साबळे हे चौघेजण या अपघातात किरकोळ जखमी झाले होते. उपचारानंतर ते पुढे मुंबईला पोहोचले असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान या अपघातामुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासगी प्रवासी वाहनांची आरटीओतर्फे नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

ओळख पटविण्यासाठी संपर्क कराजिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र त्याचे अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. याबरोबरच सदर ट्रॅव्हल्सने आणखी काही प्रवासी ज्यांची ट्रॅव्हल्स कंपनीकडे नोंद नाही, असे या अपघातात जखमी अथवा मृत झाले असतील तर संबंधितांच्या नातेवाइकांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी ८६६८७८४८४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

आरटीओच्या नाकर्तेपणामुळेच अपघात वाढलेआरटीओ कार्यालयातील काहींनी थेट ट्रॅव्हल्सच्या धंद्यात भागिदारी केली आहे. यासाठी स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्समधून अतिरिक्त होणारी प्रवासी वाहतूक याकडे दुर्लक्ष केले जाते. ट्रॅव्हल्स चालकांकडून वसुलीसाठी प्रतिनियुक्तीवर विशेष अधिकारी आणला आहे. ओव्हरलोडचाही हिशेब त्याच अधिकाऱ्याकडे आहे. आर्थिक हितसंबंधातून होत असलेल्या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष झाल्यानेच अपघात वाढले आहे. यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :fireआग