शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्यांना भोगाव्या लागतात नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST

महागाव : तालुक्यातील मलकापूर व चिखलीवासीयांना रस्त्याच्या दुर्दशेमुळे नरकयातना भोगाव्या लागत आहे. रस्ता दयनीय झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहे. ...

महागाव : तालुक्यातील मलकापूर व चिखलीवासीयांना रस्त्याच्या दुर्दशेमुळे नरकयातना भोगाव्या लागत आहे. रस्ता दयनीय झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहे.

१५ वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता बांधणीचे काम करण्यात आले. मात्र, रस्त्याची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने आता रस्त्याची खस्ता हालत झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी नागरिकांना खड्ड्यासह चिखलातून ये-जा करावी लागत आहे. रस्त्यासाठी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना वारंवार पत्र दिले. नवीन रस्त्याची मागणी केली. परंतु त्यांची मागणी बेदखल करण्यात आली.

मतांचा जोगवा मागण्यासाठी लोकप्रतिनिधी गावात एकदा येतात. नंतर त्यांना गावाचा विसर पडतो. त्यामुळे आता सुविधांसाठी शासनस्तरावरून दखल घेण्याची गरज असल्याचे गावकरी सांगतात. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत असून साधे पायदळ चालणेसुद्धा कठीण झाले आहे.

बॉक्स

लोकवर्गणीतून बुजविले खड्डे

रस्ता किमान चालण्यायोग्य व्हावा म्हणून काही ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून खड्डे बुजविले. मात्र, गावातील कुणी आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यात न्यायचे झाल्यास नेता येत नाही. विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ये-जा करण्यासाठी त्रास होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

200921\img-20210919-wa0047.jpg

लोकं सहांगतून रस्त्याचे खड्डे बुजवितांना मलकापूर चिखली येथील नागरिक