शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

तालुका नगरपंचायत, अधिक लोकसंख्येची गावे मात्र वंचित

By admin | Updated: October 11, 2015 00:36 IST

तालुका मुख्यालयाच्या सर्व ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याच्या शासनाच्या निर्णयावर जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे.

यवतमाळ : तालुका मुख्यालयाच्या सर्व ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याच्या शासनाच्या निर्णयावर जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे. कमी लोकसंख्या असूनही केवळ तालुक्याची आहे म्हणून ग्रामपंचायतींची नगरपंचायत झाली. तर दुसरीकडे दहा हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली डझनावर गावे मात्र नगरपंचायतीचा दर्जा व पर्यायाने विकासापासून कोसोदूर राहिली आहे. १ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याचा गुरुवार हा अखेरचा दिवस होता. या नगरपंचायतींची ही पहिलीच निवडणूक आहे. त्या अनुषंगाने तेथील मतदार संख्या व सदस्य संख्येची चर्चा होऊ लागली आहे. शासनाने तालुकास्तरावर असलेल्या सर्व ग्रामपंचायतींना थेट नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. ते घेताना लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, तेथील सदस्य संख्या, आर्थिक स्तर याचा विचार केला गेला नाही. केवळ तालुका मुख्यालय हा एकमेव निकष ठेवला गेला. एकीकडे झरी सारख्या देशातील सर्वात लहान ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. अर्थात येथून पुढे झरीला नगरविकास विभागामार्फत राज्याचा व केंद्राचा मोठ्या प्रमाणात शहरी विकासासाठी निधी मिळणार आहे. कमी लोकसंख्या असलेल्या या गावाचा झपाट्याने विकास झालेला पहायला मिळेल. या उलट अवस्था १० ते १५ हजार लोकसंख्या असलेल्या गावांची दिसेल. कारण जिल्ह्यात पाटणबोरी, मुकुटबन, मोहदा, काळीदौलत फुलसावंगी, ढाणकी, शेंबाळपिंपरी, बोरीअरब, लोही, जवळा, वडकी या सारखी अधिक लोकसंख्येची अनेक गावे आहेत. त्यांना विकासाची गरज आहे. तेथे पायाभूत सुविधांचीही मारामार आहे. ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने तेथील विकास रखडला आहे. या गावांना विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींवर अवलंबून रहावे लागते. मात्र तालुका मुख्यालय या निकषात बसत नसल्याने या गावांचा पुढे आणखी अनेक वर्ष विकास होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच या गावातील नागरिकांचा नगरपंचायतीचे धोरण ठरविणाऱ्या युती शासनाविरुद्ध रोष पहायला मिळतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)