शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीच्या वसुलीमुळे घबराहट

By admin | Updated: December 3, 2014 22:58 IST

बँकांकडून सक्तीची वसुली होत नसल्याचे कितीही दावे करण्यात येत असले तरी ग्रामीण भागात मात्र बँकेचे वसुली पथक घरोघरी फिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे.

शेतकऱ्यांच्या मागे बँकेचा तगादा : दोन वर्षाच्या नापिकीमुळे आर्थिक संकट
महागाव कसबा : बँकांकडून सक्तीची वसुली होत नसल्याचे कितीही दावे करण्यात येत असले तरी ग्रामीण भागात मात्र बँकेचे वसुली पथक घरोघरी फिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात पाहिजे तसे शेतीचे उत्पादन झाले नाही. कधी अतिवृष्टी, गारपीट तर कधी अत्यल्प पाऊस यामुळे जिल्ह्यातील नगदी समजले जाणारे कापूस व सोयाबीनसारखे पिकही शेतकऱ्यांना तारू शकले नाही. आधीचेच कर्ज अंगावर असल्यामुळे बँका नवीन कर्ज देण्यास तयार नाही. त्यातच जुन्या कर्जासाठी शेतकऱ्यांच्या मागे सततचा तगादा बँकांनी लावल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे. केवळ बँकांचेच नाही तर सध्या शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी केंद्र व इतर शेती साहित्य विक्रेत्यांचे कर्ज आहे. अशावेळी कुणाकुणाचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे. सध्याच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांजवळ कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी दमडीही नाही. अशा स्थितीत बँक व लोकांचे देणे कसे करावे, हा मोठा प्रश्न आहे.
अशा स्थितीत अनेकांनी खासगी सावकारांचे कर्जही घेतले आहे. परंतु बँका व कर्जदार थांबण्याच्या स्थितीत नाही. बँकेचे वसुली पथक शेतकऱ्यांच्या मागेच लागले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दुचाकीसाठी कर्ज घेतले होते. परंतु नापिकीमुळे ते या कर्जाचे हप्तेही भरू शकले नाही. आता मात्र वाहनाच्या वसुलीसाठी बँकेचे पथक तगादा लावत आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांच्या तर दुचाकी ओढून नेण्यात आल्या आहे. अशा परिस्थितीत शासनसुद्धा कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. राज्यात आलेले नवीन सरकार अजूनही स्थिरावले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस घोषणा भाजपा सरकारने केलेली नाही. शेतकऱ्यांना राज्यातील सत्ता परिवर्तनातून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु अद्याप तरी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असे कोणतेही चित्र शासनाकडून दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मते मिळवून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपा सरकारबाबत आता मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. बँक तोट्यात असल्याचे कारण सांगून वसुली सुरू आहे. यातच संचालकांच्या जवळच्या लोकांना मात्र वसुलीतून वगळण्यात येत आहे. अशा स्थितीत काय करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. भारनियमनामुळे रबी पिकालाही ओलित करणे कठीण झाले आहे. वीज कंपनीसुद्धा वसुलीच्या मागे लागली आहे. शासनाने यामध्ये त्वरित मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)