शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची आता जिल्हाभर रथयात्रा

By admin | Updated: December 23, 2016 02:04 IST

सतत पाच निवडणुकांमधील पराभवामुळे मोडकळीस आलेल्या काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठी

बैठक : निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती
यवतमाळ : सतत पाच निवडणुकांमधील पराभवामुळे मोडकळीस आलेल्या काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठी आता जिल्हाभर रथयात्रा काढण्याचा निर्णय नेत्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या रथयात्रेच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्नही काँग्रेस करणार आहे.
जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक बुधवारी शासकीय विश्रामभवनात पार पडली. उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, विधान परिषद, नगरपरिषदा अशा पाठोपाठ निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची गरज आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण करता यावे या दृष्टीने काँग्रेसने वणीपासून उमरखेडपर्यंत सर्व १६ ही तालुक्यात रथयात्रा काढण्याचे ठरविले आहे. आचारसंहिता लागण्याची शक्यता पाहता वेळ कमी असल्याने या रथयात्रेबाबत तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याच्या नियोजनासाठी नेते-पदाधिकाऱ्यांची पुन्हा लगेच बैठक घेतली जाणार आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा विजयाचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे.
जनतेतील नाराजी कॅश करण्याच्या दृष्टीने आणि काँग्रेस पक्षाबाबत जनतेत पुन्हा विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने रथयात्रा उपयोगी ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त केला गेला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण निर्मिती करून मतदारांना वास्तव पटवून देण्याचा व त्या माध्यमातून काँग्रेसचे संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न नेते-पदाधिकाऱ्यांकडून होणार आहे. या बैठकीमध्ये लहान पक्षांसोबत आघाडी करण्याच्या दृष्टीनेही प्राथमिक चर्चा झाली. मात्र या संबंधिचे अधिकार पक्षश्रेष्ठी स्थानिक पातळीवर देतात की नाही याबाबतची साशंकता पदाधिकाऱ्यांमध्ये पहायला मिळाली. (जिल्हा प्रतिनिधी)

जिल्हा काँग्रेसला सेनापतीच मिळेना !
शतकोत्तरी परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाला यवतमाळ जिल्ह्यात नवा जिल्हाध्यक्ष मिळेनासा झाला आहे. म्हणायला अनेक नावे पुढे येत असली तरी त्यावर नेत्यांमध्ये कुणाबाबतही एकमत होताना दिसत नाही. काँग्रेस कमिटीने पॅनलवर दोन नावे पाठविली असली तरी त्याबाबतही काहींची नाराजी आहे. सेनापतीच नसताना काँग्रेसच्या जिल्हाभरातील सैनिकांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढवायच्या कशा हा प्रश्न आहे.